शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बिर्यानी आणि १०० रुपयासाठी 'तिने' ४२ बस जाळल्या ?

By admin | Updated: September 19, 2016 10:48 IST

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १९ - कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या. फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीसाठी इतक्या मोठया प्रमाणावर बसेसची जाळपोळ करण्यात आल्याचा संशय आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, यात सी. भाग्या नावाच्या महिलेचा समावेश आहे. भाग्यावर बसेस जाळण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याचा संशय आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिला फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीचे आश्वासन देण्यात आले होते. 
 
बस डेपोतील सीसीटीव्ही फुटेजवरुन भाग्या मुख्य चिथावणीखोर असल्याचा पोलिसांना संशय आहे.  भाग्या गिरीनगरमध्ये रहाते. १२ सप्टेंबरला दुपारी ती घरी आल्यानंतर तिच्या ओळखीचे काहीजण घरी आले. त्यांनी तिला आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. त्यामोबदल्यात त्यांनी १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानी देण्याचे आश्वासन दिले असे भाग्याची आई यलम्माने सांगितले. 
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला दिसत असली तरी, ती जाळपोळीमध्ये सक्रीय असल्याचे स्पष्ट झालेले नाही. १२ सप्टेंबरला बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी ४०० जणांना अटक झाली. त्यामध्ये भाग्या एकमेव महिला आहे. सध्या तिची पोलिस कसून चौकशी करत आहेत. जाळपोळ करणा-यांमध्ये भाग्याचा समावेश असला तरी ती, जमावाचे नेतृत्व करत होती हे अजून स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांनी सांगितले.