शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत नेत्यांत अस्थिरता

By admin | Updated: December 5, 2015 00:42 IST

पुतळा सुशोभिकरण : येडेमच्छिंद्रच्या सामाजिक कार्यक्रमास राजकारणाची झालर

अशोक पाटील-- इस्लामपूर --येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसर सुशोभिकरण्याच्या उद्घाटन समारंभास सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास काही नेते वेळेत आले, तर काहींना उशीर झाला. त्यामुळे एकूणच कार्यक्रमात निरुत्साह जाणवत होता. येडेमच्छिंद येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर होत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर भाषणबाजी करुन काँग्रेस नेते निघून गेले. एकूणच उपस्थित नेत्यांकडे सत्ता नसल्याने त्यांच्यात अस्थिरता असल्याचे जाणवत होते.इस्लामपूर येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण केले. याच्या उद्घाटनासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांना पाचारण केले होते. परंतु काही कारणाने ते येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, हुतात्मा संकुलाचे युवा नेते, सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या नेत्यांमध्ये कसलाही ताळमेळ नव्हता. सायंकाळी ४.३0 वाजता असणारा कार्यक्रम दोन तास उशिरा सुरु झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार जयंत पाटील यांनीच कार्यक्रमास येण्यास उशीर केला. त्यामुळे वेळेत आलेल्या काँग्रेसच्या मोहनराव कदम, राहुल महाडिक यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. उद्घाटनानंतर भाषणे सुरु झाल्यानंतर जयंत पाटील यांचे आगमन झाले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याहस्ते फीत कापून दुसऱ्यांदा उद्घाटनाचा फार्स करण्यात आला.सर्जेराव यादव यांनी चांगल्या भावनेने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या, शेतकरी संघटनेच्या नेत्यांना हे रुचले नसल्यानेच त्यांनी, तातडीची कामे असल्याचे कारण सांगून कार्यक्रमातून काढता पाय घेणे पसंत केले.सध्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांत कमालीची अस्थिरता आहे. जयंत पाटील यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत असली तरी, राज्यात पक्षाला स्थान नाही. त्यामुळे सत्ता नाही याची मोठी रुखरुख त्यांना लागली आहे. काँग्रेसला दिवस चांगले असले तरी, काही मतदार संघात काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मुंबईत ठाण मांडून असून, सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते शरीराने एकत्र असले तरी, ते मनाने एकत्र नव्हते. उपस्थित नेत्यांमधील एकाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात कमालीची अस्थिरता असल्याचे चित्र दिसत होते.राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर होत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर भाषणबाजी करुन काँग्रेस नेते निघून गेले. एकूणच उपस्थित नेत्यांकडे सत्ता नसल्याने त्यांच्यात अस्थिरता असल्याचे जाणवत होते. कार्यक्रम दोन तास उशिरा सुरु झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार जयंत पाटील यांनीच कार्यक्रमास येण्यास उशीर केला.