शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

राज्यसभेत आता भाजपा सर्वात मोठा पक्ष, मात्र बहुमतापासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 11:21 IST

राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे.  भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे.

नवी दिल्ली, दि.4 - राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे.  भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. राज्यसभेत भाजपाचे एकूण 58 सदस्य आहेत तर काँग्रेसचे 57 सदस्य आहेत.  

मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेवर निवडून आलेले भाजपाचे खासदार सम्पतिया उइके यांनी गुरुवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर या जागेवर निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, उइके यांची बिनविरोध निवड झाली आहे.  नरेंद्र मोदी सरकार मे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्यसभेत भाजपाचे सर्वाधिक खासदार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी भाजपा समोर आला असला तरी राज्यसभेत बहुमतापासून बराच पछाडीवर आहे.  दरम्यान, काँग्रेस पक्ष 2018 पर्यंत राज्यसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या स्वरुपातच कायम राहिला असता मात्र काँग्रेसमधील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या सदस्यांची संख्या कमी झाली.  

पुढील आठवड्यात राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील 6 जागा पश्चिम बंगाल तर तीन जागा गुजरातमधील आहेत. या निवडणुकीमुळे भाजपावर फारसा काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र गुजरातमधील दोन जागा विजय मिळेल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर  तिस-या जागेवर भाजपाला काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना जिंकू द्यायचे नाही.  

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या दोन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र पार्टी केवळ एकाच खासदाराला राज्यसभेवर पाठवू शकते. तर ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विजय मिळवला आहे त्यावरुन त्यांचा पक्ष 5 जागांवर आरामात जिंकणार हे स्पष्ट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भाजपाला राज्यसभेत पुढील वर्षी बराच फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशातील 9 पैकी 8 जागांवर भाजपाला विजयाची अपेक्षा आहे कारण भाजपानं काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीतही मोठे यश मिळवले आहे. लोकसभेमध्ये भाजपाचे बहुमत आहे मात्र राज्यसभेत बहुमत नाही. दरम्यान, भाजपा-जेडीयू युतीचा फायदा भाजपा होण्याची शक्यता आहे. कारण जेडीयूचे 10 खासदार राज्यसभेत आहेत.