शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 18:50 IST

Bird Flu : मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटाशी आपण सामना करत असतानाच आता 'बर्ड फ्लू'च्या उद्रेकाने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. याच दरम्यान दिल्लीमध्ये बर्ड फ्लूची (Bird Flu) भीती निर्माण झाली आहे. दिल्लीमधील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

कावळ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झालं असून डॉक्टरांची टीम तातडीनो घटनास्थळी दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर विहारमधील सेंट्रल पार्कमधील मृत कावळ्यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या पार्कचे केअर टेकर टिंकू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पार्कमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्याने कावळ्यांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक कावळ्यांची अवस्था बिकट आहे."

डॉक्टरांच्या टीमने घटनास्थळाची केली पाहणी

टिंकू चौधरी यांनी व्हायरल होत असलेला कावळ्यांचा व्हिडीओ आपणच तयार केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. पार्कच्या कर्मचाऱ्यांनी दोन डॉक्टरांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली. आता या मृत कावळ्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजेल अशी माहिती दिली आहे. तसेच देशातील काही राज्यात बर्ड फ्लू आढळल्याने दिल्लीतील कावळ्यांचा मृत्यू झाला हा चिंतेचा विषय आहे. या कावळ्यांच्या मृत्यू थंडी किंवा बर्ड फ्लू ही दोन कारणं असू शकतात असं एका डॉक्टरने म्हटलं आहे. 

बर्ड फ्लूच्या पक्ष्यांचा मृत्यू पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणांच्या जवळ जास्त होतो. त्यामुळे प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच याचं नेमकं कारण समजणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नसताना आणखी एक मोठी समस्या समोर आली आहे. ती आहे बर्ड  फ्लू. हा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक आहे. भारत सरकारनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश, केरळमध्ये बर्ड फ्लू आला आहे. अशात केंद्र सरकारकडून एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. ज्याव्दारे देशात येत असलेल्या या केसेसवर लक्ष ठेवलं जाईल.

बर्ड फ्लूची लक्षणं...

>> खोकला

>> ताप

>> घशात खवखवणे

>> स्नानूंमध्ये ताण

>> डोकेदुखी

>> श्वसनास त्रास होणे 

टॅग्स :delhiदिल्लीBird Fluबर्ड फ्लूDeathमृत्यू