शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उद्घाटनासाठी भाजप आमदार नारळ फोडायला गेल्या, नारळ तसाच राहिला, रस्ता उखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:58 IST

उद्घाटनावेळीच दिसून आला रस्त्याचा दर्जा; चौकशीसाठी समिती स्थापन

लखनऊ: एखाद्या रस्त्याचं, इमारतीचं, प्रकल्पाचं उद्घाटन करताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. नारळ वाढवून भूमिपूजन करण्याची, उद्घाटन करण्याची आपली संस्कृती आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भ्रष्टाचाराचा एक भलताच प्रकार समोर आला आहे. बिजनौरमध्ये रस्त्याचा शुभारंभ करण्याआधी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मात्र नारळ फुटलाच नाही. त्याऐवजी रस्त्याचं मात्र नुकसान झालं. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमातच समोर आलं. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

बिजनौरमध्ये सिंचन विभागानं कालव्याजवळ एक रस्ता तयार केला. त्यासाठी १ कोटी १६ लाख रुपये खर्च आला. एकूण ७ किलोमीटरचा रस्ता तयार करून कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे. मात्र त्यापैकी केवळ ७०० मीटर रस्त्याचंच काम पूर्ण झालं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची मौसम चौधरींना बोलावण्यात आलं. काल संध्याकाळी त्या पतीसोबत उद्घाटनासाठी पोहोचल्या.

विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना नारळ वाढवण्यास सांगितलं गेलं. आमदारांनी नारळ फोडण्यासाठी तो जमिनीवर आपटला. मात्र नारळ फुटलाच. मात्र त्याऐवजी रस्ता उखडला. डांबराचे तुकडे उडाले. त्यानंतर आमदार नाराज झाल्या. उद्घाटनाचा कार्यक्रम सोडून त्या निघून गेल्या. 

त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी केली. ग्रामस्थांची बैठक झाली. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती डीएम उमेश मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनी आमदारांकडून माहिती घेत पीडब्ल्यूडीच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मिश्रा यांनी दिलं.