शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

उद्घाटनासाठी भाजप आमदार नारळ फोडायला गेल्या, नारळ तसाच राहिला, रस्ता उखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:58 IST

उद्घाटनावेळीच दिसून आला रस्त्याचा दर्जा; चौकशीसाठी समिती स्थापन

लखनऊ: एखाद्या रस्त्याचं, इमारतीचं, प्रकल्पाचं उद्घाटन करताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. नारळ वाढवून भूमिपूजन करण्याची, उद्घाटन करण्याची आपली संस्कृती आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भ्रष्टाचाराचा एक भलताच प्रकार समोर आला आहे. बिजनौरमध्ये रस्त्याचा शुभारंभ करण्याआधी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मात्र नारळ फुटलाच नाही. त्याऐवजी रस्त्याचं मात्र नुकसान झालं. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमातच समोर आलं. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

बिजनौरमध्ये सिंचन विभागानं कालव्याजवळ एक रस्ता तयार केला. त्यासाठी १ कोटी १६ लाख रुपये खर्च आला. एकूण ७ किलोमीटरचा रस्ता तयार करून कडापूर, झालपूर, उलेढा आणि हिमपूरला जोडण्याची योजना आहे. मात्र त्यापैकी केवळ ७०० मीटर रस्त्याचंच काम पूर्ण झालं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आमदार सूची मौसम चौधरींना बोलावण्यात आलं. काल संध्याकाळी त्या पतीसोबत उद्घाटनासाठी पोहोचल्या.

विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना नारळ वाढवण्यास सांगितलं गेलं. आमदारांनी नारळ फोडण्यासाठी तो जमिनीवर आपटला. मात्र नारळ फुटलाच. मात्र त्याऐवजी रस्ता उखडला. डांबराचे तुकडे उडाले. त्यानंतर आमदार नाराज झाल्या. उद्घाटनाचा कार्यक्रम सोडून त्या निघून गेल्या. 

त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी केली. ग्रामस्थांची बैठक झाली. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती डीएम उमेश मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनी आमदारांकडून माहिती घेत पीडब्ल्यूडीच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मिश्रा यांनी दिलं.