शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:05 IST

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला."

जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी समान नागरी संहितेसंदर्भात अथवा युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात भाष्य केले आहे. "जोवर देशाच्या लोकसंख्येच्या 20 टक्के असलेल्या मुस्लिम समाजाला विश्वासात घेतले जात नाही, तोवर कायदा बदलता येणार नाही. जसे आपण CAA आणि NRC संदर्भात बघितले की, संपूर्ण देशात निदर्शने झाली होती. जोवर सरकार या कायद्यामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांना विश्वासात घेत नागी, तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनाचा उल्लेख - एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला. यामुळे, त्यांनी यूसीसीसंदर्भात कायदा तयार केला तरी ते तो लागू करू शकणार नाही. लोकशाही व्यवस्थेत, जेव्हा आपण एखादा कायदा तयार करता, तेव्हा त्याचा ज्या समुहांवर अथवा लोकांवर परिणाम होणार आहे, त्या सर्वांन विश्वास घ्यावे, अशी अपेक्षा आपल्याकडून केली जाते."

पंतप्रधान मोदींनीही केले आहे भाष्य -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समान नागरी संहितेसंदर्भात (यूसीसी) भाष्य केले होते. मोदी म्हणाले होते की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने वारंवार UCC संदर्भात चर्चा केली आहे. अनेक वेळा आदेश दिले आहेत. आपण ज्या नागरी संहितेंतर्गत जगत आहोत ती प्रत्यक्षात एक कम्युनल आणि भेदभाव करणारी आहे, असे देशातील एका मोठ्या वर्गाचे मत आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरUniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपाMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी