शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:05 IST

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला."

जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी समान नागरी संहितेसंदर्भात अथवा युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात भाष्य केले आहे. "जोवर देशाच्या लोकसंख्येच्या 20 टक्के असलेल्या मुस्लिम समाजाला विश्वासात घेतले जात नाही, तोवर कायदा बदलता येणार नाही. जसे आपण CAA आणि NRC संदर्भात बघितले की, संपूर्ण देशात निदर्शने झाली होती. जोवर सरकार या कायद्यामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांना विश्वासात घेत नागी, तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनाचा उल्लेख - एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला. यामुळे, त्यांनी यूसीसीसंदर्भात कायदा तयार केला तरी ते तो लागू करू शकणार नाही. लोकशाही व्यवस्थेत, जेव्हा आपण एखादा कायदा तयार करता, तेव्हा त्याचा ज्या समुहांवर अथवा लोकांवर परिणाम होणार आहे, त्या सर्वांन विश्वास घ्यावे, अशी अपेक्षा आपल्याकडून केली जाते."

पंतप्रधान मोदींनीही केले आहे भाष्य -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समान नागरी संहितेसंदर्भात (यूसीसी) भाष्य केले होते. मोदी म्हणाले होते की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने वारंवार UCC संदर्भात चर्चा केली आहे. अनेक वेळा आदेश दिले आहेत. आपण ज्या नागरी संहितेंतर्गत जगत आहोत ती प्रत्यक्षात एक कम्युनल आणि भेदभाव करणारी आहे, असे देशातील एका मोठ्या वर्गाचे मत आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरUniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपाMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी