शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:27 IST

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?"

जनसुराज पक्षाचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल, तसेच 40 जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, आपला पक्ष 2030 च्या विधानसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर महिला उमेदवार देईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ते रविवारी पाटण्यातील बापू सभागृहात आयोजित जन सूरज महिला संवाद कार्यक्रमानंतर प्रशांत किशोर पत्रकारांशी बोलत होते.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यावर भर - प्रशांत किशोर म्हणाले, जोवर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर समाजातील त्यांचा सहभाग समानतेच्या आधारावर होऊ शकत नही. यामुळे यावेळी 40 महिलांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी ४ टक्के व्याजाने कर्ज मिळावे, यासाठी सरकारी हमी आवश्यक आहे, अशी मागणीही प्रशांत किशोर यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी बिहारमध्ये जनतेचे सरकार येणार असून, 2 ऑक्टोबरला जन सूरज पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

केवळ जातवार जनगणना करून गरिबी दूर होणार नाही -जातवार जनगणनेच्या मागणीसंदर्भात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही?" एवढेच नाही तर, "देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" असा सवालही यावेळी प्रशांत किशोर यांनी केला.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा