शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:27 IST

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?"

जनसुराज पक्षाचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल, तसेच 40 जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, आपला पक्ष 2030 च्या विधानसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर महिला उमेदवार देईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ते रविवारी पाटण्यातील बापू सभागृहात आयोजित जन सूरज महिला संवाद कार्यक्रमानंतर प्रशांत किशोर पत्रकारांशी बोलत होते.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यावर भर - प्रशांत किशोर म्हणाले, जोवर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर समाजातील त्यांचा सहभाग समानतेच्या आधारावर होऊ शकत नही. यामुळे यावेळी 40 महिलांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी ४ टक्के व्याजाने कर्ज मिळावे, यासाठी सरकारी हमी आवश्यक आहे, अशी मागणीही प्रशांत किशोर यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी बिहारमध्ये जनतेचे सरकार येणार असून, 2 ऑक्टोबरला जन सूरज पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

केवळ जातवार जनगणना करून गरिबी दूर होणार नाही -जातवार जनगणनेच्या मागणीसंदर्भात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही?" एवढेच नाही तर, "देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" असा सवालही यावेळी प्रशांत किशोर यांनी केला.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा