शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:27 IST

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?"

जनसुराज पक्षाचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल, तसेच 40 जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, आपला पक्ष 2030 च्या विधानसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर महिला उमेदवार देईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ते रविवारी पाटण्यातील बापू सभागृहात आयोजित जन सूरज महिला संवाद कार्यक्रमानंतर प्रशांत किशोर पत्रकारांशी बोलत होते.

महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यावर भर - प्रशांत किशोर म्हणाले, जोवर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर समाजातील त्यांचा सहभाग समानतेच्या आधारावर होऊ शकत नही. यामुळे यावेळी 40 महिलांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी ४ टक्के व्याजाने कर्ज मिळावे, यासाठी सरकारी हमी आवश्यक आहे, अशी मागणीही प्रशांत किशोर यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी बिहारमध्ये जनतेचे सरकार येणार असून, 2 ऑक्टोबरला जन सूरज पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

केवळ जातवार जनगणना करून गरिबी दूर होणार नाही -जातवार जनगणनेच्या मागणीसंदर्भात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही?" एवढेच नाही तर, "देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" असा सवालही यावेळी प्रशांत किशोर यांनी केला.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा