शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

Nitish Kumar: "तेव्हा भाजपाने लालकृष्ण आडवाणींना बळ द्यायला हवे होते, पण..."; नितीश कुमारांची भाजपावर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:51 IST

नितीश कुमार मोदी सरकारवर बरसले.. आणखी काय काय म्हणाले, वाचा सविस्तर

Bihar Politics CM Nitish Kumar: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने आज बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. पण फ्लोअर टेस्टच्या वेळी बराच गदारोळ झाला. गदारोळ इतका वाढला होता की, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून बाहेर पडले. त्याचवेळी, फ्लोर टेस्ट दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. नितीश यांनी तर २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपाने त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला असा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी आपल्या भाषणात भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख केला.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या महागठबंधन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत असूनही सत्ताधाऱ्यांनी मतदान घेण्याची मागणी केली होती. तर भाजपाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर होत असताना मतदानाची काय गरज असल्याचे म्हटले होते. मात्र मतदान झाले आणि भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानात नितीश यांच्या बाजूने १६० मते पडली. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

"भाजपा सोडल्यानंतर देशभरातील पक्षांच्या लोकांनी मला फोन करून हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊल लढा दिला तर २०२४ ची निवडणूक नक्कीच आपण जिंकू. दिल्लीतून काहीही केले जात नाही, केवळ प्रसिद्धी केली जाते. आणि इथे सामान्य लोकांचे उत्पन्न कमी होते. भाजपाने जेडीयू आणि जुन्या नेत्यांना बाजूला करण्याचा कट रचला. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा लालकृष्ण अडवाणींना बळ देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही", अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीवर टीका केली.

"नंदकिशोर यादव यांना विधानसभेचे अध्यक्ष करतील, असे भाजपाने आधी सांगितले होते. मात्र त्यानंतर विजय सिन्हा यांना हे पद देण्यात आले. २०२० मध्ये आम्ही सांगितले होते की जर भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण माझ्यावर दबाव आणून मला CM पदी बसवण्यात आले", असा दावा नितीश कुमार यांनी केला. ३२०२४ च्या निवडणुकीसाठी नितीश यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना, "मला काहीही बनण्याची इच्छा नाही", असेही ते म्हणाले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदी