शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 00:22 IST

RJD Vs JDU: गेल्या काही वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत.

 पाटणा - गेल्या काही वर्षांपासून बिहारच्याराजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत. आता राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आरजेडी आणि जेडीयूमधील नेत्यामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध दोन्ही पक्षांमधील परस्पर सहमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या घडामोडींबाबत आरजेडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारले असता ते संतप्त झाले.महाआघाडीमधील या बेबनावाबाबत विचारले असता तेजस्वी यादव यांनी प्रसारमाध्यमांनाच चार शब्द सुनावले. ते म्हणाले की, तुमच्या संस्थांमध्ये काय करायचं हे संपादक ठरवतात, की वार्ताहर संपादकांना सांगतात की, काय करायचं आहे ते, असे तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्याराजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या आरजेडी आणि जेडीयूने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा आघाडी करत सरकार स्थापन केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांत नेत्यांमध्ये होत असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये होत असलेल्या मतभेदांचे कारण आरजेडी नेते आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस बाबत केलेले वादग्रस्त विधान असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विधानावरून भाजपा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका जेडीयू नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी जेडीयूकडून केली जात आहे. मात्र आरजेडी या मागणीवर अंमलबजावणी न करता परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल