शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 00:22 IST

RJD Vs JDU: गेल्या काही वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत.

 पाटणा - गेल्या काही वर्षांपासून बिहारच्याराजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत. आता राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आरजेडी आणि जेडीयूमधील नेत्यामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध दोन्ही पक्षांमधील परस्पर सहमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या घडामोडींबाबत आरजेडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारले असता ते संतप्त झाले.महाआघाडीमधील या बेबनावाबाबत विचारले असता तेजस्वी यादव यांनी प्रसारमाध्यमांनाच चार शब्द सुनावले. ते म्हणाले की, तुमच्या संस्थांमध्ये काय करायचं हे संपादक ठरवतात, की वार्ताहर संपादकांना सांगतात की, काय करायचं आहे ते, असे तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्याराजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या आरजेडी आणि जेडीयूने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा आघाडी करत सरकार स्थापन केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांत नेत्यांमध्ये होत असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये होत असलेल्या मतभेदांचे कारण आरजेडी नेते आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस बाबत केलेले वादग्रस्त विधान असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विधानावरून भाजपा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका जेडीयू नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी जेडीयूकडून केली जात आहे. मात्र आरजेडी या मागणीवर अंमलबजावणी न करता परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल