शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, जदयू-राजद आघाडीवर प्रशांत किशोरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:53 IST

Bihar Political Crisis: नितीश कुमार आज दुपारी आठव्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

Prashant Kishor On Nitish Kumar:बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली असून, आज ते लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार आणि बिहार राजकारणाचे निरीक्षक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

'एनडीएला जनादेश दिला होता'माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, 'नितीश कुमार यांच्या निर्णयाचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम पडेल, हे जदयू-राजदच्या भविष्यातील कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांनी चांगले काम केले तर विरोधकांची शक्ती वाढेल आणि त्यांनी सरकार नीट चालवले नाही तर नुकसान होईल. ही वेळ 2015 पेक्षा खूप वेगळी आहे. 2015 मध्ये लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग होता, आता तसे काही नाही. एनडीएला जनादेश देण्यात आला होता, मात्र आता नवी आघाडी तयार झाली आहे.' 

नितीश कुमार यांची घसणरते पुढे म्हणाले की, 'मी याला संधीसाधू युती म्हणत नाही, फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. नितीश कुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदासाठी कधीच उमेदवार मानले नाही. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे असे म्हणणे नाही. ही शक्यता फक्त माध्यमांमध्ये सांगितली जात आहे. पंतप्रधान होणे तर दूरची गोष्ट, या पदाचा उमेदवार होणे हे लोकप्रियतेवर अवलंबून असते. 2010च्या नितीशकुमार आणि आताच्या काळात खूप फरक आहे. 2010 मध्ये त्यांचे 117 आमदार होते, 2015 मध्ये 72 आणि आता फक्त 40च्या आसपास झाले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भूमिका बदलल्या आहेत.' 

'सरकारने अंजेडा सांगावा'नवीन सरकारला सल्ला देताना पीके म्हणाले, 'हे सरकार कोणत्या अजेंड्याखाली, कोणत्या जाहीरनाम्याखाली चालणार हे त्यांनी सांगावे. दोन्ही पक्षांनी एकत्र येताना कोणत्या मुद्द्यांवर काम करणार हे जनतेला समजले पाहिजे.' जनतेवर अन्याय झाला का? यावर पीके म्हणाले, 'नेत्याने पक्ष बदलला किंवा न बदला, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांची हरकत नसते. हे पाऊल काहींच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य असेल किंवा नसेल, परंतु जमिनीवर काम केले जात आहे की नाही हे महत्वाचे आहे.' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार