शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, जदयू-राजद आघाडीवर प्रशांत किशोरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:53 IST

Bihar Political Crisis: नितीश कुमार आज दुपारी आठव्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

Prashant Kishor On Nitish Kumar:बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली असून, आज ते लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार आणि बिहार राजकारणाचे निरीक्षक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

'एनडीएला जनादेश दिला होता'माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, 'नितीश कुमार यांच्या निर्णयाचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम पडेल, हे जदयू-राजदच्या भविष्यातील कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांनी चांगले काम केले तर विरोधकांची शक्ती वाढेल आणि त्यांनी सरकार नीट चालवले नाही तर नुकसान होईल. ही वेळ 2015 पेक्षा खूप वेगळी आहे. 2015 मध्ये लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग होता, आता तसे काही नाही. एनडीएला जनादेश देण्यात आला होता, मात्र आता नवी आघाडी तयार झाली आहे.' 

नितीश कुमार यांची घसणरते पुढे म्हणाले की, 'मी याला संधीसाधू युती म्हणत नाही, फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. नितीश कुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदासाठी कधीच उमेदवार मानले नाही. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे असे म्हणणे नाही. ही शक्यता फक्त माध्यमांमध्ये सांगितली जात आहे. पंतप्रधान होणे तर दूरची गोष्ट, या पदाचा उमेदवार होणे हे लोकप्रियतेवर अवलंबून असते. 2010च्या नितीशकुमार आणि आताच्या काळात खूप फरक आहे. 2010 मध्ये त्यांचे 117 आमदार होते, 2015 मध्ये 72 आणि आता फक्त 40च्या आसपास झाले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भूमिका बदलल्या आहेत.' 

'सरकारने अंजेडा सांगावा'नवीन सरकारला सल्ला देताना पीके म्हणाले, 'हे सरकार कोणत्या अजेंड्याखाली, कोणत्या जाहीरनाम्याखाली चालणार हे त्यांनी सांगावे. दोन्ही पक्षांनी एकत्र येताना कोणत्या मुद्द्यांवर काम करणार हे जनतेला समजले पाहिजे.' जनतेवर अन्याय झाला का? यावर पीके म्हणाले, 'नेत्याने पक्ष बदलला किंवा न बदला, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांची हरकत नसते. हे पाऊल काहींच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य असेल किंवा नसेल, परंतु जमिनीवर काम केले जात आहे की नाही हे महत्वाचे आहे.' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार