शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, जदयू-राजद आघाडीवर प्रशांत किशोरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:53 IST

Bihar Political Crisis: नितीश कुमार आज दुपारी आठव्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

Prashant Kishor On Nitish Kumar:बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली असून, आज ते लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार आणि बिहार राजकारणाचे निरीक्षक प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

'एनडीएला जनादेश दिला होता'माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, 'नितीश कुमार यांच्या निर्णयाचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम पडेल, हे जदयू-राजदच्या भविष्यातील कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांनी चांगले काम केले तर विरोधकांची शक्ती वाढेल आणि त्यांनी सरकार नीट चालवले नाही तर नुकसान होईल. ही वेळ 2015 पेक्षा खूप वेगळी आहे. 2015 मध्ये लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग होता, आता तसे काही नाही. एनडीएला जनादेश देण्यात आला होता, मात्र आता नवी आघाडी तयार झाली आहे.' 

नितीश कुमार यांची घसणरते पुढे म्हणाले की, 'मी याला संधीसाधू युती म्हणत नाही, फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. नितीश कुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदासाठी कधीच उमेदवार मानले नाही. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे असे म्हणणे नाही. ही शक्यता फक्त माध्यमांमध्ये सांगितली जात आहे. पंतप्रधान होणे तर दूरची गोष्ट, या पदाचा उमेदवार होणे हे लोकप्रियतेवर अवलंबून असते. 2010च्या नितीशकुमार आणि आताच्या काळात खूप फरक आहे. 2010 मध्ये त्यांचे 117 आमदार होते, 2015 मध्ये 72 आणि आता फक्त 40च्या आसपास झाले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भूमिका बदलल्या आहेत.' 

'सरकारने अंजेडा सांगावा'नवीन सरकारला सल्ला देताना पीके म्हणाले, 'हे सरकार कोणत्या अजेंड्याखाली, कोणत्या जाहीरनाम्याखाली चालणार हे त्यांनी सांगावे. दोन्ही पक्षांनी एकत्र येताना कोणत्या मुद्द्यांवर काम करणार हे जनतेला समजले पाहिजे.' जनतेवर अन्याय झाला का? यावर पीके म्हणाले, 'नेत्याने पक्ष बदलला किंवा न बदला, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांची हरकत नसते. हे पाऊल काहींच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य असेल किंवा नसेल, परंतु जमिनीवर काम केले जात आहे की नाही हे महत्वाचे आहे.' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार