शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये दारूबंदी केवळ देशीपुरतीच?

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १ एप्रिलपासून राज्यात दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली असली तरी आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या या राज्याची ५५०० कोटी रुपयांची

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १ एप्रिलपासून राज्यात दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली असली तरी आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या या राज्याची ५५०० कोटी रुपयांची तूट लक्षात घेता ही दारूबंदी केवळ देशी दारूपुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता असल्याचे महसूल विभागात केलेल्या चौकशीवरून स्पष्ट झाले आहे.या दारुबंदीमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत आयएमएफएल या प्रतिष्ठित कंपनीच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. ‘श्रीमंत लोकांना अल्कोहोलचे दुष्परिणाम ठाऊक आहेत. परंतु गरिबांना त्याची जाणीव नाही. गरीब लोक दारूच्या प्रभावाखाली अधिक हिंसक बनतात,’ या नितीशकुमार यांनी २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या वक्तव्याचा या अधिकाऱ्याने संदर्भ दिला. सरकारला दारुबंदीवर मर्यादा घालता यावी या उद्देशाने नितीशकुमार यांनी हे संदिग्ध वक्तव्य मुद्दामहून केले होते, असे हा अधिकारी म्हणाला.‘आधी देशी दारूवरील बंदी अमलात येईल,’ असे अबकारी शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सरकारला सर्वाधिक २५०० कोटी रुपयांचे अबकारी शुल्क आयएमएफएलकडून आणि १००० कोटी रुपये व्हॅटच्या रूपाने मिळतात. तर देशी दारू विक्रीतून १५०० कोटींचा महसूल प्राप्त होतो. अशाप्रकारे एकूण महसूल ४००० कोटी आणि व्हॅट १५०० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात.समाजशास्त्रज्ञ व संशोधक राजेश सिंग यांनीही या मताशी सहमती दर्शविली. ते म्हणाले, ‘नितीशकुमार यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पाळण्यासाठी राज्याला पुढच्या पाच वर्षांत २.७ लाख कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्यात दरवर्षी देशी दारूच्या १०० ते १२० कोटी बाटल्या विकल्या जातात. देशी दारूचे व्यसन जडलेला एक मोठा वर्ग राज्यात आहे. त्यांनी देशी दारू तत्काळ सोडली तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून ही दारुबंदी आंशिक असायला पाहिजे.’ (वृत्तसंस्था)दारूबंदी सरसकट देशी-विदेशी भेद नाहीतथापि ही दारूबंदी सरसकट राहील. देशी वा विदेशी असा भेद केला जाणार नाही, असे राज्याचे अबकारी शुल्कमंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी स्पष्ट केले; पण दारूबंदीमुळे ५०,००० लोकांचा रोजगार हिरावला जाईल, असे मस्तान यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.