शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापूर्वी बिहारने निर्णय घेतला; वीज बिल २४ टक्क्यांनी वाढणार, ग्राहक शॉकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारने वीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारनेवीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमधील विद्युत ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. बिहार वीज नियामक आयोगाने वीज दरात वाढ जाहीर केली आहे. राज्यातील वीज दरात २४.१० टक्के वाढ झाली आहे. आता सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या आधारे प्रति युनिट वीज दर निश्चित केला जाणार आहे.

वीज दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा तसेच स्थिर शुल्कातही दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. वीजपुरवठ्याच्या दरात झालेल्या वाढीच्या आधारे हे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, वीज नियामक आयोगाने कंपन्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. मात्र, यानंतरही बिहारच्या जनतेला आता वीज बिलात जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

'प्रति युनिट विजेच्या दरात वाढ करण्याबरोबरच वीज बिलाच्या निश्चित शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी निश्चित शुल्क वाढले आहे, अशी माहिती बिहार वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष शिशिर कुमार सिंह यांनी दिली.

वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

सध्या बिहारमधील ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना ५० युनिट वीज वापरण्यासाठी प्रति युनिट ६.१० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, यापेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट ६.४० रुपये मोजावे लागतात. शहरी भागात १०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट ६.१० रुपये, तर अधिक वीज वापरासाठी ६.९५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागतो. मात्र, विजेचे दर वाढल्यानंतर वीजग्राहकांना प्रति युनिट किती रुपये मोजावे लागतील, याची माहिती नाही मिळालेली नाही, आता सरकार त्यावर सबसिडीही जाहीर करणार आहे. 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजBiharबिहार