शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

महाराष्ट्रापूर्वी बिहारने निर्णय घेतला; वीज बिल २४ टक्क्यांनी वाढणार, ग्राहक शॉकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारने वीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारनेवीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमधील विद्युत ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. बिहार वीज नियामक आयोगाने वीज दरात वाढ जाहीर केली आहे. राज्यातील वीज दरात २४.१० टक्के वाढ झाली आहे. आता सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या आधारे प्रति युनिट वीज दर निश्चित केला जाणार आहे.

वीज दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा तसेच स्थिर शुल्कातही दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. वीजपुरवठ्याच्या दरात झालेल्या वाढीच्या आधारे हे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, वीज नियामक आयोगाने कंपन्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. मात्र, यानंतरही बिहारच्या जनतेला आता वीज बिलात जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

'प्रति युनिट विजेच्या दरात वाढ करण्याबरोबरच वीज बिलाच्या निश्चित शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी निश्चित शुल्क वाढले आहे, अशी माहिती बिहार वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष शिशिर कुमार सिंह यांनी दिली.

वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

सध्या बिहारमधील ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना ५० युनिट वीज वापरण्यासाठी प्रति युनिट ६.१० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, यापेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट ६.४० रुपये मोजावे लागतात. शहरी भागात १०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट ६.१० रुपये, तर अधिक वीज वापरासाठी ६.९५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागतो. मात्र, विजेचे दर वाढल्यानंतर वीजग्राहकांना प्रति युनिट किती रुपये मोजावे लागतील, याची माहिती नाही मिळालेली नाही, आता सरकार त्यावर सबसिडीही जाहीर करणार आहे. 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजBiharबिहार