शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापूर्वी बिहारने निर्णय घेतला; वीज बिल २४ टक्क्यांनी वाढणार, ग्राहक शॉकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारने वीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारनेवीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमधील विद्युत ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. बिहार वीज नियामक आयोगाने वीज दरात वाढ जाहीर केली आहे. राज्यातील वीज दरात २४.१० टक्के वाढ झाली आहे. आता सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या आधारे प्रति युनिट वीज दर निश्चित केला जाणार आहे.

वीज दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा तसेच स्थिर शुल्कातही दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. वीजपुरवठ्याच्या दरात झालेल्या वाढीच्या आधारे हे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, वीज नियामक आयोगाने कंपन्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. मात्र, यानंतरही बिहारच्या जनतेला आता वीज बिलात जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

'प्रति युनिट विजेच्या दरात वाढ करण्याबरोबरच वीज बिलाच्या निश्चित शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी निश्चित शुल्क वाढले आहे, अशी माहिती बिहार वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष शिशिर कुमार सिंह यांनी दिली.

वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

सध्या बिहारमधील ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना ५० युनिट वीज वापरण्यासाठी प्रति युनिट ६.१० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, यापेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट ६.४० रुपये मोजावे लागतात. शहरी भागात १०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट ६.१० रुपये, तर अधिक वीज वापरासाठी ६.९५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागतो. मात्र, विजेचे दर वाढल्यानंतर वीजग्राहकांना प्रति युनिट किती रुपये मोजावे लागतील, याची माहिती नाही मिळालेली नाही, आता सरकार त्यावर सबसिडीही जाहीर करणार आहे. 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार 

महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजBiharबिहार