शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:24 IST

आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी यांचे नाव प्रसिद्ध आहे. ज्यांनी 22 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक हातोडा आणि छिन्नीसह 360 फूट लांब,  30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला. अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली. 30 वर्षांच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.बिहार, गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन एक अनोखं उदाहरण समोर ठेवले आहे, जे कायम लक्षात ठेवले जाईल. 30 वर्ष कष्ट करून त्याने डोंगरावरून पडणा-या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणलं. तो दररोज घरातून निघून थेट जंगलावर जात होता आणि एकट्यानं त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचा रहिवासी असलेला लौंगी भुईया आपला मुलगा, सून आणि पत्नीसमवेत राहतो. भुईयांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने ऐकले नाही व कालवा खोदण्याचं काम सुरूच ठेवलं.वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यापासून दूर गेले. त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून, या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टरसारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनवू शकेल, ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्याच वेळी लौंगी भुईया यांच्या कार्यामुळे प्रत्येक जण प्रभावित झाला आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करीत आहे. ज्यांनी 30 वर्षांत पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.