शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रेमविवाहानंतर पतीने मजुरी करून शिकवलं; शिक्षिका होताच मुख्याध्यापकसोबत पळाली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:56 IST

पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी पतीला चकरा माराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील महिपुरा गावातील रहिवासी असलेल्या चंदनसोबत ही घटना घडली आहे. 

चंदनने 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये सरितासोबत लव्ह मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याने सरिताला पुढे जाण्याची संधी दिली. तिला अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ती सरकारी शाळेत शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह पळून गेली. त्यामुळे पतीने 7 जुलै रोजी जंदाहा पोलीस ठाण्यात पत्नी आणि शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांना पत्नीला परत आणण्याची विनंती केली. 

पती चंदनने सांगितले की, तो सरिताला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी भेटला होता. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 13 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. त्यावेळी सरिता दहावी पास होती, पण पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चंदननेही आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. दोघांना 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. चंदनने सांगितले की, 2017 मध्ये सरिताने टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी तिची समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी येथे असलेल्या नॉनफर जोदपूर या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.

सरिताची हलाई ओपी परिसरातील मारिचा गावात राहणारे शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सरिताच्या मुलाने सांगितले की, आई वाईट आहे त्यामुळे त्याला फक्त वडिलांसोबत राहायचे आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फसवूव पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार