शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

प्रेमविवाहानंतर पतीने मजुरी करून शिकवलं; शिक्षिका होताच मुख्याध्यापकसोबत पळाली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:56 IST

पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका असलेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी पतीला चकरा माराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील महिपुरा गावातील रहिवासी असलेल्या चंदनसोबत ही घटना घडली आहे. 

चंदनने 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये सरितासोबत लव्ह मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याने सरिताला पुढे जाण्याची संधी दिली. तिला अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ती सरकारी शाळेत शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह पळून गेली. त्यामुळे पतीने 7 जुलै रोजी जंदाहा पोलीस ठाण्यात पत्नी आणि शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांना पत्नीला परत आणण्याची विनंती केली. 

पती चंदनने सांगितले की, तो सरिताला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी भेटला होता. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि 13 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. त्यावेळी सरिता दहावी पास होती, पण पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चंदननेही आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. दोघांना 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. चंदनने सांगितले की, 2017 मध्ये सरिताने टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी तिची समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी येथे असलेल्या नॉनफर जोदपूर या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.

सरिताची हलाई ओपी परिसरातील मारिचा गावात राहणारे शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सरिताच्या मुलाने सांगितले की, आई वाईट आहे त्यामुळे त्याला फक्त वडिलांसोबत राहायचे आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फसवूव पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार