शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

बिहारमध्ये विषारी दारूचे चार बळी

By admin | Updated: April 28, 2016 04:22 IST

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने दारूबंदी लागू केल्यापासून लपूनछपून दारूची विक्री सुरू झाली असून, ती कोणत्या दर्जाची आहे, हे न पाहताच लोक तिच्यावर उड्या मारू लागले आहेत.

पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने दारूबंदी लागू केल्यापासून लपूनछपून दारूची विक्री सुरू झाली असून, ती कोणत्या दर्जाची आहे, हे न पाहताच लोक तिच्यावर उड्या मारू लागले आहेत. काही ठिकाणी तर दारूमध्ये काय मिसळले जात आहे, याचीही माहिती नाही. अशीच विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत बिहारमध्ये चार जण मरण पावले आहेत. त्यापैकी तीन जण राजधानी पाटणामधील असून, एक जण गया शहरातील आहे. याखेरीज पाटण्याच्या रुग्णलयात चार जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.विषारी दारूमुळे पाटण्यात तीन जण मरण पावल्याच्या वृत्ताने पोलीस दल सतर्क झाले असून, ठिकठिकाणी छापे मारणे सुरू झाले आहे. अर्थात दारूबंदी असली तरी काही मोठ्या हॉटेलांत रुम बुक करून तिथे पार्ट्या सुरू असल्याचे आढळून आले. पाटण्यातील हॉटेल पनाशमध्ये अशाच प्रकारे मद्यपान करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. हे सातही जण सुरतमधील साड्यांचे व्यापारी असून, ते एका विवाह समारंभासाठी आले होते. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने त्यांनी पाटण्यात येण्यापूर्वी मुंबईत ही दारू विकत घेतली होती. प्रभूकृपाही नाहीअनेक जण दूर पल्ल्याच्या गाड्यांतून दारु आणून लपूनछपून विकत आहेत. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असल्याने रेल्वेने आणलेली दारू प्रभुकृपा म्हणून ओळखली जात आहे. मात्र हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला असून, बाहेरील राज्यांतून येणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांची अनेक ठिकाणी झडती घेणे सुरू झाले आहे. ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसच्या पँट्री कारच्या मॅनेजरकडून पोलिसांनी दारूच्या १२ बाटल्या हस्तगत केल्या. (वृत्तसंस्था)दारू बाळगल्यास १0 वर्षे शिक्षेची बिहारमध्ये तरतूद आहे.