शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले”; राबडी देवी यांनी घेतली नितीश कुमारांची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 14:34 IST

Rabri Devi Reaction Over Nitish Kumar Statement: नितीश कुमार यांनी केलेल्या विधानासंदर्भात देशभरातून टीका केली जात आहे.

Rabri Devi Reaction Over Nitish Kumar Statement: देशभरात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापले असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या एका विधानानंतर गदारोळ सुरू झाला असून, तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, यातच बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मातोश्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांची बाजू घेतली असून, चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले, असे म्हटले आहे. 

बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मुले जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल, अशा आशयाचे विधान नितीश कुमार यांनी केले. यावरून नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र, राबडी देवी यांनी बाजू घेतली आहे. 

चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले

बडी देवी म्हणाल्या, त्यांच्या तोंडून चुकून तसे विधान बाहेर पडले. या विधानाबद्दल त्यांनी सभागृहात माफी मागितली आहे. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे. नितीश कुमार यांनी त्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. ते चुकून तसे बोलून गेले, असे राबडी देवी यांनी सांगितले. तत्पूर्वी, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचा बचाव केला आहे. वाद वाढत असताना मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही, असे सांगून ते केवळ लैंगिक शिक्षणाबाबत बोलत होते, जे शाळांमध्येही शिकवले जाते, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यासंदर्भात आता नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मी तर केवळ महिलांच्या शिक्षणासंदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो, अशी नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार