शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Bihar Election 2020: भाजपच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद; पक्षालादेखील कल्पना नसेल

By कुणाल गवाणकर | Updated: November 1, 2020 08:31 IST

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी नकोशा विक्रमाची नोंद

पाटणा: विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव झंझावाती प्रचारसभा घेत आहेत. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा उडाला असताना भारतीय जनता पक्षाच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. हा विक्रम बंडखोरांच्या बाबतीतला आहे.विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या मुख्यालय स्तरावरील ४३ जणांना भाजपनं घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा विचार केल्यास निलंबितांची संख्या आणखी वाढते. भाजपमध्ये पहिल्यांदाच स्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीयूची युती आहे. मात्र जवळपास १८ जागांवर भाजपच्या नेत्यांनी जदयूविरोधात दंड थोपटले आहेत. तर जवळपास डझनभर मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी स्वपक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिलं आहे. भाजपचे अनेक नेते जागावाटपावरून नाराज झाले. भाजप नेते दावा करत असलेले मतदारसंघ जेडीयू आणि अन्य मित्र पक्षांकडे गेल्यानं भाजप नेत्यांनी दुसऱ्या पक्षांची वाट धरत निवडणुकीचं तिकीट मिळवलं.भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर करताच जवळपास डझनभर इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि स्वपक्षालाच आव्हान दिलं. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपमध्ये यंत्रणा आहे. भाजपच्या नाराज नेत्यांनी इतर पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्यास पक्ष त्यांच्याशी संवाद साधतो. पक्षाचे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. बिहारमध्येही तसा प्रयत्न झाला. पण बंडखोरांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यामुळे सध्याच्या घडीला तीन डझनहून अधिक नेत्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलं आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार