विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी १३०२ उमेदवार रिंगणात आहेत. २० जिल्ह्यांतून १७६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी १३७२ अर्ज वैध ठरले. ७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
गुरुवारी या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतर आता अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत.
११ ‘मैत्रिपूर्ण’ लढती
एकीकडे महाआघाडीत सारे काही अलबेल आहे असे सांगण्याचा प्रयत्न नेते करीत असले तरी ११ जागांवर आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत. कहलगाव, वैशाली, नरकटियागंज, सिकंदरा, सुल्तानगंज, बछवाडा, राजापाकर, बिहार शरीफ, करगहर, चैनपूर, बेलदौर या मतदारसंघांत ‘मैत्रिपूर्ण’ लढती होतील.
Web Summary : Bihar's second phase sees 1302 candidates contesting 122 seats across 20 districts. After withdrawals, 1372 applications are valid. Despite alliance claims, 11 constituencies face 'friendly' fights within the Mahagathbandhan, including key areas like Kahalgaon and Vaishali, leading to potentially split votes.
Web Summary : बिहार के दूसरे चरण में २० जिलों की १२२ सीटों पर १३०२ उम्मीदवार चुनाव लड़ेंगे। नाम वापसी के बाद १३७२ आवेदन वैध पाए गए। गठबंधन के दावों के बावजूद, कहलगाँव और वैशाली जैसे प्रमुख क्षेत्रों सहित ११ निर्वाचन क्षेत्रों में महागठबंधन के भीतर 'मैत्रीपूर्ण' लड़ाई है, जिससे वोटों का विभाजन हो सकता है।