शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

लोकसभा निवडणुका मे महिन्यात कशासाठी?; निवडणूक प्रक्रियेवर नितीश कुमारांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 10:47 IST

निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो

पटणा - लोकसभा निवडणूक 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया घेऊन निवडणूक इतकी लांबविण्याची आवश्यकता नव्हती असं मतं मांडले आहे. 

यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवशात मतदान व्हायला नको, फेब्रुवारी-मार्च अथवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या पाहिजेत. निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. त्यावर निवडणुकीची प्रक्रिया इतकी लांबविण्याची गरज आहे का? यावर चर्चा करुन सहमती घेतली पाहिजे. एका टप्प्यात निवडणुका होणं आदर्श आहे पण आपला देश मोठा असल्याने दोन-तीन टप्प्यात निवडणुका व्हायला हव्यात असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता एका टप्प्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही मात्र दोन-तीन टप्प्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो असं नितीश कुमार म्हणाले. 

साध्वी यांच्या विधानावर भाजपा कारवाई करेल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेवर केलेलं विधान स्वीकार करणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम भाजपा करेल. भ्रष्टाचार, गुन्हा आणि धार्मिक तेढ यांच्याशी तडजोड केली जावू शकत नाही. 

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. त्यामुळे विरोधकांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे तो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यावर भाष्य केलं जाईल असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात बिहारमधील पटणा साहिब, पाटलीपुत्र, नालंदा या मतदारासंघासह 8 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीसोबत युती करुन नितीश कुमार यांची जेडीयू बिहारमध्ये 17 जागा लढवत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nitish Kumarनितीश कुमारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग