शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुका मे महिन्यात कशासाठी?; निवडणूक प्रक्रियेवर नितीश कुमारांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 10:47 IST

निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो

पटणा - लोकसभा निवडणूक 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया घेऊन निवडणूक इतकी लांबविण्याची आवश्यकता नव्हती असं मतं मांडले आहे. 

यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवशात मतदान व्हायला नको, फेब्रुवारी-मार्च अथवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या पाहिजेत. निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. त्यावर निवडणुकीची प्रक्रिया इतकी लांबविण्याची गरज आहे का? यावर चर्चा करुन सहमती घेतली पाहिजे. एका टप्प्यात निवडणुका होणं आदर्श आहे पण आपला देश मोठा असल्याने दोन-तीन टप्प्यात निवडणुका व्हायला हव्यात असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता एका टप्प्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही मात्र दोन-तीन टप्प्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने मतदार, नेते, पक्ष आणि मिडीया सर्वांना त्रास सहन करावा लागतो. इतक्या तापमानात मतदान करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो असं नितीश कुमार म्हणाले. 

साध्वी यांच्या विधानावर भाजपा कारवाई करेल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेवर केलेलं विधान स्वीकार करणे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम भाजपा करेल. भ्रष्टाचार, गुन्हा आणि धार्मिक तेढ यांच्याशी तडजोड केली जावू शकत नाही. 

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. त्यामुळे विरोधकांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे तो लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यावर भाष्य केलं जाईल असंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात बिहारमधील पटणा साहिब, पाटलीपुत्र, नालंदा या मतदारासंघासह 8 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीसोबत युती करुन नितीश कुमार यांची जेडीयू बिहारमध्ये 17 जागा लढवत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nitish Kumarनितीश कुमारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग