शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:03 IST

मिथिलेशने खूप मेहनत करून प्रीतीला शिकवलं होतं. मात्र प्रीतीला नोकरी लागताच तिने आपल्या मजूर पतीला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

यूपीच्या ज्योती मौर्याप्रमाणेच प्रीती कुमारीची चर्चा देखील आता जोरदार रंगली आहे. गया येथील एका मजुराची मोठी फसवणूक झाली आहे. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल झाल्याबरोबर पत्नी प्रीती कुमारीने पती मिथिलेश कुमारला सोडलं. मिथिलेशने खूप मेहनत करून प्रीतीला शिकवलं होतं. मात्र प्रीतीला नोकरी लागताच तिने आपल्या मजूर पतीला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. त्यांना एक 6 वर्षांचा मुलगाही आहे.

हे प्रकरण गयाच्या शेरघाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामपूर पंचायतीच्या भुजौल गावातील आहे. मिथिलेशने सांगितलं की, प्रीती झारखंडमधील हंटरगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते, पण बोधगया बीएमपीमध्ये नोकरी मिळाल्यानंतर प्रीतीच्या वागण्यात खूप बदल झाला. आता ती फोन उचलत नाही आणि भेटू इच्छित नाही.

मिथिलेश आणि प्रीतीने लव्ह मॅरेज केलं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. हताश झालेल्या मिथिलेशने गया एसएसपीकडे लेखी तक्रार केली आहे. पत्नीला त्याच्याकडे परत आणण्याची विनंती त्याने एसएसपीकडे केली आहे. मिथिलेश म्हणाला, मी खूप मेहनत केली, माझ्या पत्नीला शिकविले आणि नोकरी मिळवण्यासाठी खूप काही केले, पण आता नोकरी मिळाल्यानंतर तिने मला सोडलं. ती माझ्याकडे येत नाही.

मिशिलेशने सांगितलं की, प्रीतीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २०१२ मध्ये तिचा मुलाशी घटस्फोट झाला होता, त्यानंतर ती त्याच्यासोबत राहू लागली आणि त्यानंतर २०१७ मध्ये एका मंदिरात त्यांनी लग्न केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिथिलेशला आशा आहे की, त्याला न्याय मिळेल आणि त्याची पत्नी त्याच्याकडे परत येईल.

या प्रकरणी बोधगया बीएमपीमध्ये तैनात असलेल्या प्रीती कुमारी या महिला कॉन्स्टेबलचं काही वेगळेच म्हणणं आहे. तिचा पती मिथिलेश हा हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे. प्रीती कुमारी म्हणाली की, आता ती मिथिलेशसोबत राहणार नाही. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Biharबिहार