शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'जम्मू-काश्मीरमधील बिहारींच्या हातात आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका द्या', भाजपा आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:31 IST

Jammu-Kashmir Attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बिहारी नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्यामुळे बिहारी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे.

Jammu-Kashmir Attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्येबिहारी नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्यामुळे बिहारी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य जनतेसोबतच राज्याचे नेते देखील खूप संतापलेले पाहायला मिळाले आहेत. सरकार आणि विरोधी पक्षातील नेते केंद्र सरकारकडे याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. आता तर बिहारमधील एका भाजपा आमदारानं धक्कादायक मागणी केली आहे. भाजपा आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू (BJP MLA Gynendra Gyanu) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्याला असलेल्या बिहारी नागरिकांना आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका देण्याची मागणी केली आहे. 

भारतीय संविधानात काही महत्त्वाचे बदल करुन सध्याची परिस्थिती पाहता जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्याला असलेल्या परराज्यातील नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना सरकारनं द्यायला हवा. तेथील बिहारी नागरिकांना सरकारनं मोफत AK-47 बंदुका घेऊन द्यायला हव्यात जेणेकरुन त्यांना स्वत:चं रक्षण करता येईल, असं विधान ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या घटनेचा कठोर शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला. 

"दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये गरीब नागरिकांची हत्या करत आहेत. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव घेतला जात आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या साथीनं बिहारी जनतेला लक्ष्य करत आहेत. केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी. परराज्यातील नागरिकांना सुरक्षा सरकारनं द्यायला हवी", असं ज्ञानेंद्र यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी करत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याचीही गोष्ट बोलून दाखवली आहे. जम्मू-काश्मीरलमधील हिंसाचार लक्षात घेता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत-पाक क्रिकेट सामना रद्द केला जावा, अशी मागणी तारकिशोर प्रसाद यांनी केली होती. 

टॅग्स :BiharबिहारTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर