शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 14:17 IST

Bihar Assembly Election Results : सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली.

ठळक मुद्देनिकालानंतर सीवानमध्ये बुधवारी भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीवान : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालानंतर सीवानमध्ये भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, घटनेतील पीडितांकडून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देवेशकांत सिंह यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे काही समर्थक जखमी झाले आहेत. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबीयांनी आपल्या घरांवर राजदचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजपा समर्थक नाराज होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल हाती येताच भाजपाच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे समर्थक गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांच्यावर सीवानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी समर्थकांच्या म्हणण्यानुसार, घरावर राजदचा झेंडा लावण्यावरून गावात भाजपा समर्थक नित्यानंद सिंह यांच्यासहित १४ जणांनी मारहाण केली. दरम्यान,  या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

निकालाकडे सर्वांचे लक्ष...बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकाचा निकाल आता सर्वांसमोर आला आहे. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने १२२ बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले. रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. 

नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल