शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 08:21 IST

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

ठळक मुद्देबिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल पाहता सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरले आहेत. एनडीएने बाजी मारली तर आरजेडीने सुद्धा चांगली टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. यातच, असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

बिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही. दरम्यान, सीमांचलमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक एनडीएला पराभूत करण्यासाठी मतदान करतील आणि त्याचा फायदा महाआघाडीला होईल, असे गणित असे मांडण्यात येत होते. मात्र ओवैसी यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.

बिहारनंतर उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सतत ओवैसी यांच्यावर मतं फोडण्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आता बिहारमधील विजयामुळे खूश झालेल्या ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "बंगाल आणि यूपीच्या निवडणुकाही लढवणार आहोत, तुम्ही काय कराल? निवडणुका लढविणे हे आपले काम आहे आणि लोकशाहीने आम्हाला हा अधिकार दिला आहे."

पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीत थोडा फरक होता. जिथे भाजपाला ४०.२५ टक्के मतं मिळाली होती, तिथे ४३.२९ टक्के मते मिळाली. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणात माहिर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी आता ओवैसी यांची पार्टी हे एक आव्हान ठरू शकते. बिहारमध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी  ओवैसींच्या पक्षाला मतदान केले. त्यावरून हे स्पष्ट आहे की, आता देशातील मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाकडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत ओवैसी यांच्या पक्षाने बंगालमध्ये निवडणुका लढविल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होईल आणि तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात एआयएमआयएमने बसपासोबत युती केली तर सपा-काँग्रेसचे गणित बिघडणार! बिहारमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएमने बसपासोबत निवडणूक लढविली. या निवडणुकीत बसपाला एक जागा आणि एआयएमआयएमला पाच जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात दलितांचे राजकारण करणाऱ्या बसपासोबत जर एआयएमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा थेट परिणाम काँग्रेस व समाजवादी पक्षाला होईल. उत्तर प्रदेशात मुस्लिम-यादवांची पारंपारिक मतं समाजवादी पार्टीच्या पारड्यात जाताना दिसून येतात. मात्र, जर उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाला स्वीकारले तर बिहारप्रमाणेच समाजवादी पार्टीसाठी धोक्याची घंटा ठरेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल