शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 08:21 IST

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

ठळक मुद्देबिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल पाहता सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरले आहेत. एनडीएने बाजी मारली तर आरजेडीने सुद्धा चांगली टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. यातच, असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

बिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही. दरम्यान, सीमांचलमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक एनडीएला पराभूत करण्यासाठी मतदान करतील आणि त्याचा फायदा महाआघाडीला होईल, असे गणित असे मांडण्यात येत होते. मात्र ओवैसी यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.

बिहारनंतर उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सतत ओवैसी यांच्यावर मतं फोडण्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आता बिहारमधील विजयामुळे खूश झालेल्या ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "बंगाल आणि यूपीच्या निवडणुकाही लढवणार आहोत, तुम्ही काय कराल? निवडणुका लढविणे हे आपले काम आहे आणि लोकशाहीने आम्हाला हा अधिकार दिला आहे."

पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीत थोडा फरक होता. जिथे भाजपाला ४०.२५ टक्के मतं मिळाली होती, तिथे ४३.२९ टक्के मते मिळाली. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणात माहिर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी आता ओवैसी यांची पार्टी हे एक आव्हान ठरू शकते. बिहारमध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी  ओवैसींच्या पक्षाला मतदान केले. त्यावरून हे स्पष्ट आहे की, आता देशातील मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाकडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत ओवैसी यांच्या पक्षाने बंगालमध्ये निवडणुका लढविल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होईल आणि तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात एआयएमआयएमने बसपासोबत युती केली तर सपा-काँग्रेसचे गणित बिघडणार! बिहारमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएमने बसपासोबत निवडणूक लढविली. या निवडणुकीत बसपाला एक जागा आणि एआयएमआयएमला पाच जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात दलितांचे राजकारण करणाऱ्या बसपासोबत जर एआयएमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा थेट परिणाम काँग्रेस व समाजवादी पक्षाला होईल. उत्तर प्रदेशात मुस्लिम-यादवांची पारंपारिक मतं समाजवादी पार्टीच्या पारड्यात जाताना दिसून येतात. मात्र, जर उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाला स्वीकारले तर बिहारप्रमाणेच समाजवादी पार्टीसाठी धोक्याची घंटा ठरेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल