शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:35 IST

Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

अररिया - बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

अररियामध्ये मतदार अधिकार यात्रेदरम्यान राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेतच्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, मतदार यादी पुनरीक्षण म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतचोरी करू देणार नाहीत. निवडणूक आयोग भाजपला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

इंडिया आघाडीतील पक्ष एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य ते परिणाम दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी लवकरच एक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. विरोधी आघाडीचे सर्व घटक पक्ष वैचारिक व राजकीय रूपाने एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य परिणाम दिसतील, असे राहुल गांधी म्हणाले.

मिठी मारली, चुंबन घेतले राहुल गांधी दुचाकीवरून अररियाकडे रवाना झाल्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांना मिठी मारली व त्यांच्या खांद्याचे चुंबन घेतले. याचवेळी राहुल गांधी आपली दुचाकी स्थिर ठेवत असताना त्या युवकाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थापड लगावून एका बाजूला ढकलले. सुरक्षेत चूक झाल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. 

विवाहाबाबत चर्चा सुरूराहुल गांधी यांनी आपल्या विवाहाबाबत अनोख्या अंदाजात म्हटले आहे की, याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर बोलताना तेजस्वी म्हणाले की, त्यांनी लवकरात लवकर विवाह करावा. त्यावर राहुल गांधी हे त्यांच्याकडून माइक घेऊन अनोख्या अंदाजात म्हणाले की, हा सल्ला मलाही लागू होतो. तेजस्वी यांच्या वडिलांशी याबाबत चर्चा सुरू आहे.

९८% मतदारांची कागदपत्रे प्राप्तबिहारमध्ये ९८.२ टक्के मतदारांची कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा भाग म्हणून प्रकाशित झालेल्या बिहारच्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी आता फक्त आठ दिवस उरले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

फक्त ‘आधार’ वैध पुरावा नाहीच : भाजपफक्त आधार क्रमांक हा मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी वैध पुरावा ठरतो, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या यासंबंधी आदेशाचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपने विरोधकांवर केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी