शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये महाआघाडीचे गणित जुळले, RJD, काँग्रेसमध्ये असे जागावाटप ठरले

By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 19:46 IST

Bihar Assembly Election 2020 Marathi News : महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेतया महाआघाडीचे नेतृत्व आरजेडीचे नेते तेजस्वी यादव करतीलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे

पाटणा - एकीकडे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएमधील जागावाटपाचा घोळ आणि एलजेपीची नाराजी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असताना दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील जागावाटपाचे गणित सुटले आहे. महाआघाडीमध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत.महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. यावेळी महाआघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.यावेळी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी सांगितले की, काही वैचारिक मतभेद असले तरी एक भक्कम आघाडी ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत. २०१५ मध्ये महाआघाडीला जनतेने बहुमत दिले होते. मात्र दुर्दैवाने त्या बहुमताचे अपहरण झाले. नितीश कुमार यांनी धोका दिला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. आता जनता त्यांना माफ करणार नाही. या महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करतील. तर तेजस्वी यादव म्हणाले की, जर बिहारच्या जनतेने संधी दिली तर मी त्यांच्या मानसन्मानाचे रक्षण करेन. आम्ही बिहारी आहोत. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए शुद्ध आहे. बिहारचे आजचे सरकार हे साठलेले अस्वच्छ पाणी आहे. तर आम्ही वाहत्या नदीचा स्वच्छ आणि शुद्ध प्रवाह आहोत.२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने ४१ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत महाआघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नितीश कुमार यांनी काही काळानंतर महाआघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये प्रवेश केला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर दुसऱ्या टप्प्यातील मदतान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस