शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये महाआघाडीचे गणित जुळले, RJD, काँग्रेसमध्ये असे जागावाटप ठरले

By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 19:46 IST

Bihar Assembly Election 2020 Marathi News : महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेतया महाआघाडीचे नेतृत्व आरजेडीचे नेते तेजस्वी यादव करतीलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे

पाटणा - एकीकडे भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएमधील जागावाटपाचा घोळ आणि एलजेपीची नाराजी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असताना दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील जागावाटपाचे गणित सुटले आहे. महाआघाडीमध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आरजेडी १४४, काँग्रेस आणि डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत.महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. यावेळी महाआघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे.यावेळी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी सांगितले की, काही वैचारिक मतभेद असले तरी एक भक्कम आघाडी ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत. २०१५ मध्ये महाआघाडीला जनतेने बहुमत दिले होते. मात्र दुर्दैवाने त्या बहुमताचे अपहरण झाले. नितीश कुमार यांनी धोका दिला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. आता जनता त्यांना माफ करणार नाही. या महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करतील. तर तेजस्वी यादव म्हणाले की, जर बिहारच्या जनतेने संधी दिली तर मी त्यांच्या मानसन्मानाचे रक्षण करेन. आम्ही बिहारी आहोत. जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. माझा डीएनए शुद्ध आहे. बिहारचे आजचे सरकार हे साठलेले अस्वच्छ पाणी आहे. तर आम्ही वाहत्या नदीचा स्वच्छ आणि शुद्ध प्रवाह आहोत.२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने ४१ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत महाआघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नितीश कुमार यांनी काही काळानंतर महाआघाडीची साथ सोडत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये प्रवेश केला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बिहारमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर दुसऱ्या टप्प्यातील मदतान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस