शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाजपाच्या पराभवासाठी केलेला मोठा त्यागही कमीच पडेल- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:36 IST

संघ व भाजपच्या फॅसिझम, राग, विद्वेष पसरविणाऱ्या तसेच भेदभाव करणाऱ्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी कितीही मोठा त्याग केला तरी तो कमीच पडेल, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे केले.

अहमदाबाद : रा. स्व. संघ व भाजपच्या फॅसिझम, राग, विद्वेष पसरविणाऱ्या तसेच भेदभाव करणाऱ्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी कितीही मोठा त्याग केला तरी तो कमीच पडेल, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे केले.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही उपस्थित होत्या. भाजपाचा पाडाव करण्यासाठी महत्त्वाच्या राज्यांत कोणत्या पक्षांबरोबर आघाडी करावी हे ठरविण्याचे सर्वाधिकार कार्यकारिणी राहुल गांधींना दिले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहून, कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ झाला. त्याआधी काँग्रेस नेत्यांनी साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर होणारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये तब्बल ५८ वर्षांनंतर या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. याआधी अशी बैठक १९६१ साली भावनगरमध्ये पार पडली होती.ही लढाई आम्ही जिंकूचकाँग्रेस कार्यकारिणीच्या सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजिलेल्या बैठकीत ते म्हणाले की, विद्वेषी प्रवृत्तींचा पराभव करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. गांधीजींनी काढलेल्या दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी काँग्रेसने हा पण केला आहे. ही लढाई आम्ही जिंकूच असे राहुल गांधी म्हणाले.मोदींमुळे जनता पीडित : सोनिया गांधीपंतप्रधान मोदी स्वत: पीडित असल्याचे भासवतात. प्रत्यक्षात त्यांच्या धोरणामुळे जनताच पीडित आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रहिताशी निगडीत मुद्द्यांवर भाजपा राजकारण करत आहे. ही अतिशय चुकीची कृती आहे.अर्थव्यवस्थेला घरघरमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हणाले आहे की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. प्रत्येक बाबतीत मोदी सरकार खोटा प्रचार करत आहे. यूपीए सरकारने ज्या उत्तम योजना राबविल्या होत्या त्यांची माहिती जनतेला पुन्हा सांगणे आवश्यक आहे. मोदींच्या कारकीर्दीत देशाची पिछेहाट झाल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ