शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द; विशेषाधिकार समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:32 IST

Congress MP Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे.

Congress MP Adhir Ranjan Chowdhury:संसदेचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणांनी गाजले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदीशी केली होती. यामुळे अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणाचा वादग्रस्त भाग संसदेच्या रेकॉर्डवरून हटविण्यात आला होता. परंतु, त्याच्या पुढच्याच दिवशी चौधरी यांना  निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. याने अधीर रंजन चौधरी यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

अधीर रंजन चौधरींनी व्यक्त केला खेद

अधीर रंजन चौधरी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानाबाबत खेद व्यक्त केला. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मी माझ्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त करतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीला सांगितले, अशी माहिती भाजप खासदार सुनील कुमार सिंह यांनी दिली. सुनील कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेषाधिकार समितीने अधीर रंजन चौधरी यांना म्हणणे मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. 

दरम्यान, समितीने अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव लवकरात लवकर लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल, अशी माहिती विशेषाधिकार समितीतील एका सदस्याने दिली. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्याबाबतचा ठराव मांडला होता. पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री संसदेला संबोधित करत असताना अधीर रंजन चौधरी यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळताच सरकारने अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता, जो लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. यानंतर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले.

 

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा