शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मोठा दिलासा! लोन मोरेटोरियमचे व्याज सरकार भरणार; कर्जदार सुखावले

By हेमंत बावकर | Updated: October 3, 2020 12:01 IST

EMI moratorium : आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती.

कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर आरबीआयने लोन मोरेटोरिअम जाहीर केला होता. यामुळे या काळात नोकरी गमावलेल्या किंवा रोजगार गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, बँकांनी या काळातील चक्रवाढ व्याज आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे थकलेल्या ईएमआयपेक्षा कितीतरी अधिक पटींनी या व्याजाचा भुर्दंड ग्राहकांना बसणार होता. यावर आता मोठा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31 ऑगस्टला ही मुदत संपली होती. याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती. यावर केंद्राने तो बँकांचा विषय असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्र सरकार, आरबीआय जबाबदारीपासून पळू शकत नाहीत, असे सुनावले होते. तसेच पुढील वेळी पूर्ण नियोजन करून या, असेही सांगितले होते. 

यावर केंद सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामध्ये बँक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या मोरेटोरियमवर अतिरिक्त व्याज माफ केले जाणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच एमएसएमई, एजुकेशन, होम, कंज्यूमर, ऑटो लोनवर लागू केलेले चक्रवाढ व्याज वसूल केले जाणार नाही. तसेच क्रेडिट कार्डवरील व्याजही वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.

चक्रवाढ व्याजाचे गणित कसे होते?आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली होती. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले होते. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले होते. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत. 

  • जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार होती. 
  •  
  • जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार होती.
  •  
  • एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार होती. 
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या