शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:57 IST

GST council meet Politics: जीएसटी बदलाच्या निर्णयावेळी जीएसटी परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. सत्ताधारी राज्यांना केंद्र सरकार म्हणतेय त्या प्रमाणे करणे भाग होते, परंतू विरोधी पक्षांच्या राज्यांचे काय, असा सवाल उपस्थित झाला होता.

जीएसटी परिषदेची पहिल्या दिवशीची बैठक सायंकाळी सात वाजता संपणार होती, परंतू जीएसटी कपातीवर विरोधी पक्षांची राज्ये अडून बसल्याने ती रात्री साडे नऊपर्यंत लांबली होती. खूप राजकारण झाले, विरोधी राज्यांनी आपले नुकसान होत असल्याचा मुद्दा लावून धरला होता. परंतू, अखेर प्रकरण आपल्याच अंगलट येणार असल्याचे जाणवू लागताच जीएसटी कपातीच्या केंद्र सरकारच्या सुरात सूर मिसळला आणि जीएसटी कपातीचे घोडे गंगेत न्हाले. 

२२ सप्टेंबरपासून नव्या जीएसटी बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आजपासून २१ सप्टेंबरपर्यंतचा काळ हा सर्वच कंपन्यांसाठी मंदीचा ठरणार आहे. यानंतर एकदम मागणी वाढणार आहे. जीएसटी बदलाच्या निर्णयावेळी जीएसटी परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. सत्ताधारी राज्यांना केंद्र सरकार म्हणतेय त्या प्रमाणे करणे भाग होते, परंतू विरोधी पक्षांच्या राज्यांचे काय, असा सवाल उपस्थित झाला होता. केंद्र सरकारने यावर गेल्या सहा महिन्यांपासूनच कवायत सुरु केली होती. राज्य सरकारांना मोठ्या उत्पन्नावर दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागणार होते. जीएसटी आला तेव्हा राज्यांना व्हॅट व इतर कर रद्द झाल्याने मोठे नुकसान झाले होते. आता जीएसटी कपात झाल्याने होणार होते. 

गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या सहा महिन्यांपासून बैठका सुरु केल्या होत्या. जीएसटी कपात झाल्यानंतर काही वाद नकोत आणि देशाचा संघराज्याची रचना शाबूत रहावी हा त्यामागे उद्देश होता. सर्व तयारी पूर्ण झाली तरी जीएसटी परिषदेच्या बैठकीत पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ आणि कर्नाटक या राज्यांनी महसूल घटण्यावरून विरोध सुरु केला. काही चर्चेनंतर पंजाब आणि प. बंगालने तयारी दर्शविली परंतू कर्नाटक आणि केरळचे अर्थमंत्री, प्रतिनिधी काही केल्या ऐकायला तयार नव्हते. महसुल बुडणार त्यावर केंद्राने ठोस आश्वासन द्यावे म्हणून ते अडून राहिले. 

नंतर या दोन राज्यांनी उद्यावर म्हणजेच ४ सप्टेंबरपर्यंत जीएसटी निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच निर्णय घ्यायचा आहे, मी त्यासाठी रात्रभर चर्चेला बसायला तयार असल्याचे सांगितले. तरीही कर्नाटक आणि केरळ तयार झाले नाहीत. अखेरीस मतदानाचा पर्याय शिल्लक राहिला होता. आतापर्यंत एकमताने जीएसटीचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे मतदान झाले तर केरळ आणि कर्नाटकच्या सरकारवरच सारा खेळ उलटणार होता. अखेर पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि कर्नाटक, केरळला तयार केले. तोपर्यंत रात्रीचे साडे नऊ वाजले होते. जर मतदान झाले असते तर कर्नाटक आणि केरळमध्ये राज्य सरकारविरोधात संदेश गेला असता. सत्ताधारी जिंकले असते तरी विरोधक उघडे पडले असते. यामुळे विरोधकांनी नमते घेतले आणि जीएसटी कपातीचे घोडे गंगेत न्हाले, अशी माहिती सुत्रांनी आजतकला दिली आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनKarnatakकर्नाटकKeralaकेरळ