शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:57 IST

GST council meet Politics: जीएसटी बदलाच्या निर्णयावेळी जीएसटी परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. सत्ताधारी राज्यांना केंद्र सरकार म्हणतेय त्या प्रमाणे करणे भाग होते, परंतू विरोधी पक्षांच्या राज्यांचे काय, असा सवाल उपस्थित झाला होता.

जीएसटी परिषदेची पहिल्या दिवशीची बैठक सायंकाळी सात वाजता संपणार होती, परंतू जीएसटी कपातीवर विरोधी पक्षांची राज्ये अडून बसल्याने ती रात्री साडे नऊपर्यंत लांबली होती. खूप राजकारण झाले, विरोधी राज्यांनी आपले नुकसान होत असल्याचा मुद्दा लावून धरला होता. परंतू, अखेर प्रकरण आपल्याच अंगलट येणार असल्याचे जाणवू लागताच जीएसटी कपातीच्या केंद्र सरकारच्या सुरात सूर मिसळला आणि जीएसटी कपातीचे घोडे गंगेत न्हाले. 

२२ सप्टेंबरपासून नव्या जीएसटी बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आजपासून २१ सप्टेंबरपर्यंतचा काळ हा सर्वच कंपन्यांसाठी मंदीचा ठरणार आहे. यानंतर एकदम मागणी वाढणार आहे. जीएसटी बदलाच्या निर्णयावेळी जीएसटी परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. सत्ताधारी राज्यांना केंद्र सरकार म्हणतेय त्या प्रमाणे करणे भाग होते, परंतू विरोधी पक्षांच्या राज्यांचे काय, असा सवाल उपस्थित झाला होता. केंद्र सरकारने यावर गेल्या सहा महिन्यांपासूनच कवायत सुरु केली होती. राज्य सरकारांना मोठ्या उत्पन्नावर दुसऱ्यांदा पाणी सोडावे लागणार होते. जीएसटी आला तेव्हा राज्यांना व्हॅट व इतर कर रद्द झाल्याने मोठे नुकसान झाले होते. आता जीएसटी कपात झाल्याने होणार होते. 

गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या सहा महिन्यांपासून बैठका सुरु केल्या होत्या. जीएसटी कपात झाल्यानंतर काही वाद नकोत आणि देशाचा संघराज्याची रचना शाबूत रहावी हा त्यामागे उद्देश होता. सर्व तयारी पूर्ण झाली तरी जीएसटी परिषदेच्या बैठकीत पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ आणि कर्नाटक या राज्यांनी महसूल घटण्यावरून विरोध सुरु केला. काही चर्चेनंतर पंजाब आणि प. बंगालने तयारी दर्शविली परंतू कर्नाटक आणि केरळचे अर्थमंत्री, प्रतिनिधी काही केल्या ऐकायला तयार नव्हते. महसुल बुडणार त्यावर केंद्राने ठोस आश्वासन द्यावे म्हणून ते अडून राहिले. 

नंतर या दोन राज्यांनी उद्यावर म्हणजेच ४ सप्टेंबरपर्यंत जीएसटी निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच निर्णय घ्यायचा आहे, मी त्यासाठी रात्रभर चर्चेला बसायला तयार असल्याचे सांगितले. तरीही कर्नाटक आणि केरळ तयार झाले नाहीत. अखेरीस मतदानाचा पर्याय शिल्लक राहिला होता. आतापर्यंत एकमताने जीएसटीचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे मतदान झाले तर केरळ आणि कर्नाटकच्या सरकारवरच सारा खेळ उलटणार होता. अखेर पश्चिम बंगालच्या अर्थमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि कर्नाटक, केरळला तयार केले. तोपर्यंत रात्रीचे साडे नऊ वाजले होते. जर मतदान झाले असते तर कर्नाटक आणि केरळमध्ये राज्य सरकारविरोधात संदेश गेला असता. सत्ताधारी जिंकले असते तरी विरोधक उघडे पडले असते. यामुळे विरोधकांनी नमते घेतले आणि जीएसटी कपातीचे घोडे गंगेत न्हाले, अशी माहिती सुत्रांनी आजतकला दिली आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनKarnatakकर्नाटकKeralaकेरळ