शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

स्टार्ट अप इंडियामध्ये युवकांना मोठी संधी - नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 27, 2015 12:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशवासियांना नाताळ आणि आगामी नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'  कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी देशवासियांना  नाताळ आणि आगामी नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी स्वच्छतेच्या मुद्दावर भर दिला. 
सध्या नाताळच्या सुट्टया असल्याने देशात पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण अतिथी देवो भव म्हणतो. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येणार असतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या पर्यटनस्थळी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवली पाहिजे. ज्यामुळे जगात भारताची प्रतिमा आणखी चांगली होईल असे मोदी म्हणाले. 
या संवाद कार्यक्रमातून त्यांनी सरकारच्या विविध योजना कशा यशस्वी, परिणामकारक ठरल्या त्याचीही माहिती दिली. मी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टँण्ड अप इंडिया योजनेबद्दल बोललो होतो. स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टँण्ड अप इंडिया योजनेमध्ये देशातील युवकांना मोठी संधी असून, येत्या १६ जानेवारीला आम्ही या योजनेचा अँक्शन प्लान सादर करणार आहोत. देशातील विद्यापीठे, युवक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. 
सामान्य माणूस जो बँकेमध्ये जाण्याचा विचारही करत नव्हता त्याला मुद्रा योजनेतंर्गत आज सहजतेने कर्ज उपलब्ध होत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करुन सहज माझ्याशी स्वत: जोडू शकता. तुमच्या नव्या कल्पना, विचार या अॅपच्या माध्यमातून मला सांगा असे आवाहन मोदींनी केले. 
 
'मन की बात' मधील मुद्दे
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमातून नाताळ आणि आगामी नववर्षाच्या देशवासियांना दिल्या शुभेच्छा.
पर्यटनस्थळी विशेष स्वच्छता अभियान राबवण्याची गरज 
अतिथी देवो भव, पाहुणे घरी येतात तेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांवरही स्वच्छता ठेवली पाहिजे.
वीज नव्या गावात पोहोचल्याची बातमी मिळते तेव्हा आनंद, समाधान मिळते.
मोबाईलमध्ये नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करा आणि थेट माझ्याशी संपर्क साधा.
१६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्ट अप इंडिया अँण्ड स्टॅंण्ड अप इंडियाचा अॅक्शन प्लान देशासमोर सादर करणार.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यंदा छत्तीसगडमध्ये युथ फेस्टीव्हलचे आयोजन, युथ फेस्टीव्हलसाठी नरेंद्र मोदी अॅपवर नव्या कल्पना सांगा.
आपण ज्यांना विकलांग म्हणतो त्यांना ईश्वराने अतिरिक्त शक्ती दिली आहे जी आपण पाहू शकत नाही, आपण तिथे विकलांगऐवजी दिव्यांग शब्द वापरु शकतो का ?
योजना लोकांसाठी असतात, त्या फायलीपर्यंत मर्यादीत रहाता कामा नयेत.
२६ जानेवारीपूर्वी कर्तव्य या विषयावर तुमचे विचार मला कळवा, या विषयावर मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत.
डीबीटीएस, थेट लाभ हस्तांतरण योजनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले, या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली.
विविध योजनांतर्गत ४० हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले.
या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता, आता पुढच्यावर्षी मन की बातमधून पंतप्रधान संवाद साधणार.