शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 20:27 IST

Air India Plane News: तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अथक प्रयत्नांनंतर हे विमान सुरक्षितरीत्या धावपट्टीवर उतरवण्यात यश आलं.

तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहकडे जात असलेल्या एअर इंडियाच्याविमानामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दोन तास हे विमान विमानतळाच्या आसपास घिरट्या घालत  होते.  या विमानामधून सुमारे १४० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर या विमानाला विमानतळावर सुखरूप उतरवण्यात यश आले आहे.

या घटनेमुळे विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळावर अग्निशमन दलाच्या १८ बंबांना पाचारण करण्यात आले  होते. विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने इंधन कमी झाल्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार असे सांगण्यात येत होते. अखेरीस हे विमान सुखरूप उतरवण्यात यश आलं. 

विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिम बिघडल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकाने हे विमान त्रिची विमानतळावर उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. वैमानिकाने पूर्ण आणीबाणीची परिस्थिती घोषित केली होती. त्यानंतर विमानतळावरील कर्मचारी या समस्येवर तोडगा काढून विमानाला सुरक्षित धावपट्टीवर उतरवून प्रवाशांना सुखरूप उतरवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAirportविमानतळ