शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मोठा मानापमान...! नितिशकुमार लोजपाच्या कार्यालयात गेले, पण चिराग पासवान नव्हते, फोन केला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:29 IST

दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोजपाचे चिराग पासवान यांच्यात जोरदार राजकारण रंगले आहे. निमित्त होते संक्रांतीवेळच्या दही-चुडा भोजनाचे. पासवान यांनी त्यांच्या कार्यालयात दही-चुडाचे आयोजन केले होते. एनडीएत असल्याने व पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी नितीशकुमार यांना बोलविले होते. नितिशकुमार दहीचुडासाठी लोजपा कार्यालयात आले तेव्हा पासवान गैरहजर राहिले. यावरून आता दोघांमधील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे. लोजपा कार्यालयात बोलविले परंतू चिराग पासवानच नसल्याने नितीश कुमार नाराज झाले आहेत. त्यांनी दही-चुडाचे भोजन न करताच तिथून काढता पाय घेतला. 

जदयूच्या नेत्यांनी हा मुख्यमंत्र्यांचा झालेले अपमान म्हटले आहे. तर पासवान यांनी यावर मुख्यमंत्री आले तेव्हा आपण पुजेला बसलो होते. लगेचच तिकडे जाणे शक्य नव्हते. परंतू, मुख्यमंत्री आले हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. कार्यकर्त्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेचा आम्ही सन्मान करतो, असे म्हटले आहे. 

सूत्रांनुसार या घटनेनंतर चिराग पासवान यांनी नितिशकुमार यांना अनेकदा फोन केला, परंतू त्यांनी पासवान यांच्याशी चर्चा केली नाही. लोजपाला नितिशकुमार यांच्यामुळे कार्यालयासाठी बंगला मिळाला आहे. या बंगल्यामध्ये पूर्वी पशुपती पारस यांचा पक्ष होता. त्यांच्याकडून हा बंगला खाली करून तो चिराग यांना देण्यात आला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानBiharबिहार