शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

भाजपाला मोठा धक्का? दक्षिणेतील हा मित्रपक्ष साथ सोडण्याच्या विचारात, या राज्यातील समीकरण बदलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:40 IST

Tamil nadu Politics News: दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमधील भाजपाचा मित्र पक्ष असलेला पीएमके एनडीएमधून वेगळा होण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. पीएमके पक्षाचा उत्तर तामिळनाडूमधील वन्नियार समाजामध्ये चांगला प्रभाव आहे.

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएतील मित्रपक्षांच्या साथीने केंद्रात सरकार स्थापन करावं लागलं होतं. त्यामुळे सद्यस्थितीत एनडीएमधील प्रत्येक मित्रपक्ष हा भाजपासाठी महत्त्वाचा बनलेला आहे. दरम्यान, दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमधील भाजपाचा मित्र पक्ष असलेला पीएमके एनडीएमधून वेगळा होण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. पीएमके पक्षाचा उत्तर तामिळनाडूमधील वन्नियार समाजामध्ये चांगला प्रभाव आहे. तसेच या पक्षाने राज्यात सत्तेवर असलेल्या डीएमकेला एक खुली ऑफर दिली आहे.  वन्नियार समाजाला अतिमागास वर्गातील (एमबीसी) कोट्यामध्ये १५ टक्के अंतर्गत आरक्षण देण्यात आलं तर तामिळनाडूमध्ये आम्ही डीएमकेला पाठिंबा देऊ, असे पीएमकेने सांगितले आहे.

दरम्यान, असं घडल्यास तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पीएमके अध्यक्ष अंबुमणी रामदास यांनी याबाबत सांगितले की, जर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वन्नियार समाजाला हे आरक्षण दिलं गेलं तर आमचा पीएमके पक्ष डीएमकेला बिनशर्त पाठिंबा देईल. तसेच पाठिंबा म्हणून आमचा पीमके पक्ष कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणार नाही.

तामिळनाडूमध्ये सध्या एकूण ६९ टक्के आरक्षण आहे. त्यात ३० टक्के आरक्षण हे इतर मागास वर्ग (ओबीसी), २० टक्के आरक्षण अतिमागास वर्ग (एमबीसी), १८ टक्के आरक्षण हे एससी आणि १ टक्का आरक्षण हे एसटी समजाला देण्यात आलेले आहे. दरम्यान, एमसीसी कोट्यामधून येणाऱ्या एकूण २० टक्के आरक्षणापैकी १५ टक्के आरक्षण हे वन्नियार समजाला देण्याची मागणी पीएमकेने केली आहे.

आपल्या मागणीचं समर्थन करताना पीएमकेने सांगितले की, सुप्रीम कोर्टाने एससी कॅटॅगरीअंतर्गत ३ टक्के अरुंधतीयार समुदायाला सबकोटा देण्याच्या निर्णयास ज्या प्रमाणे योग्य ठरवले आहे, त्याच प्रकारची व्यवस्था ही वन्नियार समुदायासाठी एमबीसीमध्ये करता येईल.

अंबुमणी रामदास यांनी सांगितले की, अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न हा जातिनिहाय आरक्षणाचा विषय नाही आहे. तर सामाजिक न्यायाचा विषय आहे. वन्नियार समुदायातील लोकांची परिस्थिती वाईट असे. तसेच त्यांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत असे. जर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला तर त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक उन्नती होईल.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपा