शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भाजपाला मोठा धक्का? दक्षिणेतील हा मित्रपक्ष साथ सोडण्याच्या विचारात, या राज्यातील समीकरण बदलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:40 IST

Tamil nadu Politics News: दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमधील भाजपाचा मित्र पक्ष असलेला पीएमके एनडीएमधून वेगळा होण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. पीएमके पक्षाचा उत्तर तामिळनाडूमधील वन्नियार समाजामध्ये चांगला प्रभाव आहे.

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएतील मित्रपक्षांच्या साथीने केंद्रात सरकार स्थापन करावं लागलं होतं. त्यामुळे सद्यस्थितीत एनडीएमधील प्रत्येक मित्रपक्ष हा भाजपासाठी महत्त्वाचा बनलेला आहे. दरम्यान, दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमधील भाजपाचा मित्र पक्ष असलेला पीएमके एनडीएमधून वेगळा होण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. पीएमके पक्षाचा उत्तर तामिळनाडूमधील वन्नियार समाजामध्ये चांगला प्रभाव आहे. तसेच या पक्षाने राज्यात सत्तेवर असलेल्या डीएमकेला एक खुली ऑफर दिली आहे.  वन्नियार समाजाला अतिमागास वर्गातील (एमबीसी) कोट्यामध्ये १५ टक्के अंतर्गत आरक्षण देण्यात आलं तर तामिळनाडूमध्ये आम्ही डीएमकेला पाठिंबा देऊ, असे पीएमकेने सांगितले आहे.

दरम्यान, असं घडल्यास तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पीएमके अध्यक्ष अंबुमणी रामदास यांनी याबाबत सांगितले की, जर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वन्नियार समाजाला हे आरक्षण दिलं गेलं तर आमचा पीएमके पक्ष डीएमकेला बिनशर्त पाठिंबा देईल. तसेच पाठिंबा म्हणून आमचा पीमके पक्ष कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणार नाही.

तामिळनाडूमध्ये सध्या एकूण ६९ टक्के आरक्षण आहे. त्यात ३० टक्के आरक्षण हे इतर मागास वर्ग (ओबीसी), २० टक्के आरक्षण अतिमागास वर्ग (एमबीसी), १८ टक्के आरक्षण हे एससी आणि १ टक्का आरक्षण हे एसटी समजाला देण्यात आलेले आहे. दरम्यान, एमसीसी कोट्यामधून येणाऱ्या एकूण २० टक्के आरक्षणापैकी १५ टक्के आरक्षण हे वन्नियार समजाला देण्याची मागणी पीएमकेने केली आहे.

आपल्या मागणीचं समर्थन करताना पीएमकेने सांगितले की, सुप्रीम कोर्टाने एससी कॅटॅगरीअंतर्गत ३ टक्के अरुंधतीयार समुदायाला सबकोटा देण्याच्या निर्णयास ज्या प्रमाणे योग्य ठरवले आहे, त्याच प्रकारची व्यवस्था ही वन्नियार समुदायासाठी एमबीसीमध्ये करता येईल.

अंबुमणी रामदास यांनी सांगितले की, अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न हा जातिनिहाय आरक्षणाचा विषय नाही आहे. तर सामाजिक न्यायाचा विषय आहे. वन्नियार समुदायातील लोकांची परिस्थिती वाईट असे. तसेच त्यांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत असे. जर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला तर त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक उन्नती होईल.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपा