शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राजीनामा देणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई, कंपनीच्या सर्व पदांवरून हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:41 IST

Ashneer Grover : राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - फिनटेक कंपनी भारत पे आणि अशनीर ग्रोव्हर यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आता राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांच्यावर भारत पेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने अशनीर ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर कंपनीने एका पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच आर्थिक अनियमिततेबाबत अशनीर ग्रोव्हर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही कंपनीकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, अशनीग ग्रोव्हर यांनी बोर्डाला एक भावूक पत्र लिहून राजीनामा दिला होता. या पत्रामध्ये अनेक भावूक बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच बोर्डावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले होते. त्यात अशनीर ग्रोव्हर म्हणाले होते की, मी दु:खी अंत:करणाने हे पत्र लिहित आहे. कारण मी जी कंपनी तयार केली, तीच कंपनी मला सोडावी लागत आहे. मात्र भारत पे फिनटेकच्या जगात अग्रणी बनली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मला आणि माझ्या कुटुंबाला अनेक निराधार बाबींमध्ये गुंतवण्यात आले. कंपनीमध्ये जे असे लोक आहेत जे माझी प्रतिमा मलिन करत आहेत. ते कंपनीचे रक्षण करण्याचा दिखावा करत असेल तरी ते प्रत्यक्षात भारत पे ला नुकसान पोहोचवू इच्छित आहेत.

दरम्यान, अशनीर ग्रोव्हरवरील कारवाईनंतर भारत पे कंपनीने सांगितले की, भारत पे आपले कर्मचारी आणि ग्राहकांसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. कंपनी यापुढेही भारतामध्ये फिनटेक लीडर राहण्यासाठी योग्य ती पावले उचलेल. कंपनीने संचालनाच्या उच्च मानकांना लागू करण्यासाठी तक्रारींबाबत अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हा तपास इंडिपेंडेंट एक्स्टर्नल अॅडव्हायझर्स करत आहेत. 

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत