शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

इस्लामनगरचं झालं जगदीशपूर, पेढे वाटून जल्लोष; रक्तरंजीत होता इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:58 IST

सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून १४ किमी अंतरावर असलेल्या एका सुंदर गावाचं पुन्हा एकदा नामकरण झालं आहे. १७ व्या शतकात या गावातील बनविण्यात आलेल्या किल्ल्यास पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कालपर्यंत या वास्तूचं नाव इस्लाम नगर होतं, ते आता पुन्हा एकदा जुन्याच नावाने म्हणजे जगदीशपूर नावाने ओळखले जाणार आहे. केंद्र सरकारने या गावाचे नामांतर जगदीशपूर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर, राज्य सरकारनेही बुधवारी नोटीफिकेशन जारी करुन या गावाचे नाव जगदीशपूर असं केलं आहे. 

इस्लामनगर गावाचे नाव जगदीशपूर झाल्यानंतर तेथील स्थानिकांनी फटाके वाजवून अन् मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. त्यावेळी, ढोल-ताशा वाजवूनही आनंद व्यक्त करण्यात आला. अंगावर काटा आणणारा हा इतिहास आहे, ज्यावेळी जगदीशपूरचे नाव इस्लामनगर करण्यात आले होते. औरंगजेबच्या सैन्याचे पळपूटे सैनिक मित्र मोहम्मद खान याने ३०८ वर्षांपूर्वी या गावाचे नाव इस्लामनगर ठेवले होते. गेल्या ३० वर्षांपासून या गावाचे नाव जगदीशपूर करण्याची फाईल सरकार दफ्तरी पडून होती. 

सन १७१५ मध्ये दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूर येथे आक्रमण केले. पण, त्यांला यश मिळाले नाही. राजपूतांवर आक्रमण केल्यानंतरही अपयश आल्यामुळे मोहम्मद खानने आपल्या स्वभावनुसार मैत्रीचा हात पुढे केला. त्याने देवरा चौहान या राजाला बेस नदीकिनारी जेवणाचे आमंत्रण दिले. देवरा चौहानसह सर्वच राजपूत रात्रीचं स्नेहभोजन करत होते, त्याचवेळी तंबूची रस्सी कापण्यात आली. या सर्व राजपूतांना तलवारीने सपासप वार करुन ठार करण्यात आले. या सर्वांच्या रक्ताचा पाट शेजारील नदीत वाहिल्यांनंतर नदीचं पाणीही लाल झालं होतं, असा इतिहास सांगतो. त्यानंतर, मोहम्मद खानने जगदीशपूरवर कब्जा केला आणि याचं नाव बदलून इस्लामनगर केलं होतं.  

 

टॅग्स :bhopal-pcभोपाळMuslimमुस्लीमhistoryइतिहासMadhya Pradeshमध्य प्रदेश