शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

Hathras Stampede : चेंगराचेंगरी थांबवू शकले असते भोले बाबा; स्वत:च म्हणाले, "माझ्या पायाखालची माती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 10:50 IST

Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

हाथरसच्या फुलराई गावात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. बाबांनी जर ठरवलं असतं तर ही दुर्घटना थांबवता आली असती. सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगासमोर प्रत्यक्षदर्शींनी या गोष्टी सांगितल्या. याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे, 

हाथरसच्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी तपास पथकासमोर त्या दिवशी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. देव चौधरी नावाच्या व्यक्तीने सांगितलं की, सत्संगाच्या वेळी बाबांनी लोकांना त्यांच्या पायाखालची माती घेण्यास सांगितलं. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि स्वयंसेवकांची कमतरता यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. महिला आरडाओरडा करत होत्या. जर बाबांनी मायक्रोफोनचा वापर करून हे थांबवा असं सांगितलं असतं तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.

भोले बाबांना बाहेर जाता यावं यासाठी मार्ग तयार करण्यासाठी त्यांचे सेवेकरी हे लोकांना बाजुला ढकलत होते असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ब्रिजबिहारी कौशिक नावाच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिघडलेल्या स्थितीसाठी त्यांनी बाबांच्या प्रायव्हेट आर्मीला आणि सेवकांनाही जबाबदार धरलं.

हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेत पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. आता मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. सोमवारी दुपारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश