शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भीमा कोरेगाव दंगल; मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:48 IST

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर ठेवला.

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर ठेवला. दंगल घडविण्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेला अद्याप अटक का केली नाही, असा जाब न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी विचारला.राज्य सरकारने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'एकबोटे आम्हाला सापडलाच नाही,' असा बचाव सरकारी वकिलांनी केली. त्यावर 'आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत. सहकार्यही करू, तेच (पोलीस) आम्हाला बोलावत नाहीत,' असे स्पष्टीकरण एकबोटेच्या वकिलांनी दिले.भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभ वंदन कार्यक्रमास गालबोट लागले होते. शौर्यस्तंभास वंदन करण्यासाठी राज्यातून आलेल्या लोकांवर जमावाने दगफेक केली. २ हजारांच्या जमावाने जमलेल्या लोकांवर अचानक हल्ला केला होता. मोठी दंगल त्यानंतर उसळली होती. एका युवकाचा मृत्यू २ गटांमधील संघर्षात झाल्याने त्यात अजूनच ठिगणी पडली. राज्यभर त्याची प्रतिक्रिया उमटली होती.संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांनीच हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. एकबोटेचा शोध तेव्हापासूनच सुरू आहे. दंगलीच्या दिवशी आपण तिथे नव्हतो, असे स्पष्टीकरण एकबोटेने दिले होते. अटकपूर्व जामिनासाठी एकबोटेची सत्र ते उच्च न्यायालयापासून धावाधाव सुरू आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एकबोटेचा थांगपत्ता लागला नाही. सर्वोच्च न्यायालयासमोर मात्र एकबोटे 'मला बोलावत नसल्याची' बतावणी करीत आहे. सरकारने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होईल.- अ‍ॅड. निशिकांत कातनेश्वरकर (राज्य सरकारचे वकील).

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMilind Ekboteमिलिंद एकबोटे