शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:52 IST

सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे.

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज लोकसभेत प्रचंड गदारोळात पार पडला. तथापि, राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही प्रमाणावर कामकाज पार पाडले. दरम्यान, राज्यसभेत पहिल्या दिवशी भाजपचे खासदार भीम सिंह यांनी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रसिद्ध समाजसुधारक स्वामी सहजानंद सरस्वती आणि फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. या तिन्ही महान व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात देशाला एक नवी दिशा दिली आहे. असेही ते म्हणाले.

एएनआय सोबत बोलताना भीम सिंह म्हणाले, "वीर सावरकर एक अशी विभूती आहे. ज्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या." ते पुढे म्हणाले, सावरकर हे केवळ एक क्रांतिकारकच नव्हे तर एक विचारकवंत, लेखक आणि दृष्टे व्यक्तीही होते. ज्यांच्यापासून भगत सिंगांसारखे क्रांतिकारकही प्रभावित झाले. दुसऱ्या बाजूला स्वामी सहजानंद सरस्वती. एक असे संन्यासी होते, ज्यांना हिमालयाच्या गुहांमध्ये नव्हे, तर गावातील शेतांमध्ये, शेतकऱ्यांच्या अश्रूंमध्ये आणि शोषितांच्या वेदनांमध्ये इश्वर बघितला. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आणि जमीनदारी उन्मूलन चळवळीला दिशा दिली आणि जय किसान या नाऱ्याला पुढे नेत एक ध्येय बनवले."

बांगलादेश युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या फील्ड मार्शल मानेक शॉ यांचा उल्लेख करत भीम सिंह यांनी त्यांनाही भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले, "भारताचे सुपुत्र मानेक शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये निर्णायक युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. इतकेच नाही तर त्यांनी बांगलादेशच्या नेतृत्वातही आपली भूमिका बजावली. फील्ड मार्शल शॉ यांच्या नेतृत्वाने, दूरदृष्नेटी आणि सामरिक कौशल्याने भारताचे नाव लष्करी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले."

सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBharat Ratnaभारतरत्नRajya Sabhaराज्यसभा