शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

Bhim Army: सत्ता परिवर्तनासाठीची लढाई सुरूच राहिल, पराभवानंतर बोलले चंद्रशेखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 20:08 IST

चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मोठा विजय मिळाला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमाही राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. कारण, युपीत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ हे पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. योगींनी गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सहजच विजय मिळवला. येथे योगींविरुद्ध लढणारे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा मोठा पराभव झाला आहे. 

चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सत्ता परिवर्तनाची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगतिलं. निवडणूक निकालातील जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेसोबत आमची ओळख झाली. आता, बहुजन समाजाला सत्तेत बसविण्यासाठी बहुजन समाजातील महापुरुष, वीरांगनांची विचारधार बहुजन हिताय, बहुजन सुखायला पुढे न्यावे लागणार आहे. यापुढील संघर्षाला सर्वच कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन मी करतो. सामाजिक व सत्ता परिवर्तनाची आपली लढाई सुरूच राहिल, असेही आझाद यांनी म्हटले.

आझाद यांना मिळाली 7543 मतं

गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निकालाच्या दिवशी सकाळपासूनच ते निकालात बाजी मारताना दिसून आले. निवडणूक आयोगने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार शेवटचा निकाला हाती आला तेव्हा, योगी आदित्यनाथ यांना 1,64,170 मतं मिळाली आहेत. तर, योगींविरुद्ध समाजवादी पक्षाच्या शुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 60,896 मतं मिळाली आहे. आझाद समाज पक्षाकडून चंद्रशेखर आझात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांना केवळ 7543 मतं मिळाली. येथून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.  

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाGorakhpurगोरखपूर