शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Bhavana Gawali Shivsena: खासदार भावना गवळींना धक्का, लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवलं; 'या' शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 16:58 IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना 'अलर्ट मोड'मध्ये

Bhavana Gawali Shivsena: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेला धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडीतून बाहेर पडावे व भाजपसोबत (BJP) सत्तेत यावे अशी बंडखोरांची मागणी होती. पण उद्धव यांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाने भाजपासोबत येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले. त्यानंतर शिवसेनेकडून भावना गवळींनाच धक्का देण्यात आला. लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांना हटवण्यात आले असून त्या जागी राजन विचारे (Rajan Vichare) यांची चिफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे शिवसेना अलर्ट मोडमध्ये गेल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली. भावना गवळी या भाजपासोबत जातील अशी भिती शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी वेळी प्रतोद पदावरील व्यक्तीचा व्हिप सर्व खासदारांना लागू असणार आहे. त्यामुळे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

राऊतांच्या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांमध्येही बंडखोरी होणार का, याचीच सर्वत्र चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBhavna Gavliभावना गवळी