शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

भारतरत्नचे यंदा पाच मानकरी?

By admin | Updated: August 10, 2014 13:11 IST

केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार यंदा एकाचवेळी पाच जणांना दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृह मंत्रलयाने या आठवडय़ाच्या प्रारंभीच रिझव्र्ह बँकेच्या टाकसाळीत भारतरत्न पुरस्काराची पाच स्मृतिचिन्हे निर्मितीची सूचना केली असून स्वातंत्र्य दिनानंतर या पुरस्कारांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात एकाच वेळी पाच स्मृतिचिन्हे बनविण्यास सांगितली याचा अर्थ एकापेक्षा अधिक लोकांना हा सन्मान प्रदान केला जाईल असेही नाही. सरकारतर्फे ही स्मृतिचिन्हे राखीवही ठेवली जाऊ शकतात. 
 काँग्रेसच्या राजवटीत नेहरू-गांधी परिवारावरच लक्ष केंद्रीत राहिल्याने अनेक मान्यवरांना हा बहुमान प्राप्त होऊ शकला नाही, अशी भावना संघ परिवारात आहे. ही भावना लक्षात घेऊन यंदा निवड केली जाईल. 
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सीएनआर राव यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी सचिनच्या आधी हॉकीपटू ध्यानचंद यांना हा सन्मान प्रदान केला जावा, अशी मागणी होती. पण सचिनला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता ध्यानचंद यांना पुरस्कार केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे. बसपाचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न देण्याचीही मागणी आहे. दलित समाजाला जवळ करण्यासाठी कांशीराम यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आझाद हिंद सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय, प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा आणि गीता प्रेसचे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार यांना हा सन्मान दिला   जाणार असल्याचे कळते.