शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Bharat Jodo yatra: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?, राहुल गांधी यांनी अखेर सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:16 IST

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे.

नवी दिल्ली-

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. भाजपा आणि स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेष पसरवण्याची आहे. आमची यात्रा भाजपाच्या याच विचारधारेच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

प्रत्येकाचं एक मत असतं. भाजपाचीही एक भूमिका आहे. संघाचीही आहे. त्यांच्या विचारांचं स्वागतच आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांना जोडण्याची यात्रा आहे. भाजपाच्या विचारधारेनं देशाचं जे नुकसान झालं आहे ते भरुन काढण्यासाठी आम्ही या यात्रेची सुरुवात केली आहे. भाजपा आणि संघाची विचारधारा द्वेष पसरवणारी विचारधारा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काय बोलले?काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी सूचक विधान केलं. "मी निवडणूक लढवणार की नाही हे लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे ते कळेलच", असं ते म्हणाले. यावर तुम्ही थेट नकार दिलेला नाही असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की, मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यावर ठाम आहे. 

भाजपानं देशातील संस्थांवर केला कब्जाकाँग्रेसचा मी सदस्य असल्याच्या नात्यानं मी या यात्रेत सहभागी आहे. ही यात्रा भारत जोडो यात्रा आहे. याचा फायदा जर काँग्रेसला होत असेल तर चांगलंच आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "भाजपानं देशातील सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. संस्थांवर दबाव टाकून कशापद्धतीनं काम केलं जात आहे ते सर्वांनाच माहित आहे. आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षासोबत नव्हे, तर आम्ही सर्व संस्थांविरोधात देखील लढा देत आहोत. मीडिया आज विरोधकांचा साथीदार राहिलेला नाही", असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी