शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Bharat Jodo yatra: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?, राहुल गांधी यांनी अखेर सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:16 IST

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे.

नवी दिल्ली-

काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा तब्बल ३५७० किमी इतका प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. भाजपा आणि स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेष पसरवण्याची आहे. आमची यात्रा भाजपाच्या याच विचारधारेच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

प्रत्येकाचं एक मत असतं. भाजपाचीही एक भूमिका आहे. संघाचीही आहे. त्यांच्या विचारांचं स्वागतच आहे. आमच्यासाठी ही यात्रा लोकांना जोडण्याची यात्रा आहे. भाजपाच्या विचारधारेनं देशाचं जे नुकसान झालं आहे ते भरुन काढण्यासाठी आम्ही या यात्रेची सुरुवात केली आहे. भाजपा आणि संघाची विचारधारा द्वेष पसरवणारी विचारधारा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काय बोलले?काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता राहुल गांधी यांनी सूचक विधान केलं. "मी निवडणूक लढवणार की नाही हे लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे ते कळेलच", असं ते म्हणाले. यावर तुम्ही थेट नकार दिलेला नाही असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की, मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यावर ठाम आहे. 

भाजपानं देशातील संस्थांवर केला कब्जाकाँग्रेसचा मी सदस्य असल्याच्या नात्यानं मी या यात्रेत सहभागी आहे. ही यात्रा भारत जोडो यात्रा आहे. याचा फायदा जर काँग्रेसला होत असेल तर चांगलंच आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. "भाजपानं देशातील सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. संस्थांवर दबाव टाकून कशापद्धतीनं काम केलं जात आहे ते सर्वांनाच माहित आहे. आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षासोबत नव्हे, तर आम्ही सर्व संस्थांविरोधात देखील लढा देत आहोत. मीडिया आज विरोधकांचा साथीदार राहिलेला नाही", असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी