शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत जोडो यात्रेकडून देशाला आशा,’ सत्यपाल मलिकांकडून राहुल गांधींची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 20:12 IST

पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. त्या दिवशी काही नव्हतं म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, मलिक यांचा टोला.

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. तसेच त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ देशासाठी काही चांगले करेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी सत्यपाल मलिक यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. यावेळी मलिक यांनी राहुल गांधींचे केवळ कौतुकच केले नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मलिक यांनी निशाणा साधत पंतप्रधान मोदी प्रत्येक तिसऱ्या दिवशी काहीतरी उद्घाटन करत असतात. कदाचित त्या दिवशी काहीच नसेल म्हणून त्यांनी राजपथाचं नाव बदललं असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील मुधी बाकापूर गावात एका कार्यक्रमादरम्यान एका सभेला संबोधित करताना सत्यपाल मलिक म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी चांगले काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशात अनेक यात्रा झाल्या आहेत का आणि त्या सर्वांचे चांगले परिणाम मिळाले आहेत असा सवाल मलिक यांना करण्यात आला. "मला आशा आहे की या यात्रेचे (भारत जोडो यात्रेचे) देशासाठी काही चांगले परिणामही होतील. आपण पंतप्रधानांच्या विरोधात नाही. परंतु त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर त्यांनी काम केलं तर ते त्यांच्या फायद्याचे ठरतील,” असे ते म्हणाले.

नावबदलायचीगरजनव्हतीराजपथाचं नाव बदलण्याची गरज नव्हतं. जरा त्यांनी दावा केला होता हे नाव देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं, इंग्रजांनी नाही, असंही मलिक म्हणाले. पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. कदाचित गुरूवारी काहीही ठरवण्यात आलं नव्हतं. म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी