शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राहुल गांधी आज कोर्टात हजर राहणार, न्याय यात्रेला ब्रेक लागणार, नेमकं प्रकरण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 09:03 IST

Bharat Jodo Nyaya Yatra: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. मात्र आज या यात्रेला काही तासांसाठी ब्रेक लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे २०१८ मधील एका प्रकरणात सुल्तानपूरमधील एका स्थानिक कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. मात्र आज या यात्रेला काही तासांसाठी ब्रेक लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे २०१८ मधील एका प्रकरणात सुल्तानपूरमधील एका स्थानिक कोर्टामध्ये हजर राहणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भारत जोडो न्याय यात्रा काही काळासाठी थांबणार आहे. कारण राहुल गांधी हे मानहानीच्या एका प्रकरणामध्ये सुल्तानपूरच्या एका स्थानि कोर्टात हजर राहणार आहेत. याबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी लिहिले की, भारत जोडो न्याय यात्रेला सोमवारी ३७ दिवस झाले आहेत, मात्र ही यात्रा मंगळवारी सकाळी थोड्या काळासाठी थांबणार आहे.  दुपारी दोन वाजता अमेठी येथील फुरसतगंज येथून पुन्हा सुरू होईल. राहुल गांधी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुलतानपूरच्या स्थानिक कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.

२०१८ मधील एका प्रकरणात राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या एका कोर्टाने समन्स बजावलं आहे. २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याविरोधात भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी तक्रार दिली होती. विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमारप पांडे यांनी सांगितले की, जर राहुल गांधी या प्रकरणात पुरावे मिळून दोषी ठरले तर त्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस