शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत कधी सहभागी होणार?; जयराम रमेश म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:38 IST

यात्रेला उत्तर प्रदेशात दाखल होऊन तीन दिवस झाले असले तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाहीत. याबाबत जयराम रमेश यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. 

भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली आहे. आज ही यात्रा वाराणसी आणि प्रयागराज मार्गे प्रतापगडला पोहोचली आहे, जी आजच राहुल गांधींचा माजी संसदीय मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये पोहोचेल. यात्रेला उत्तर प्रदेशात दाखल होऊन तीन दिवस झाले असले तरी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव अद्याप यामध्ये सहभागी झालेले नाहीत. याबाबत आता जयराम रमेश यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. 

काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उद्या अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी होतील अशी आशा आहे. अपना दल (कमेरवादी) नेत्या पल्लवी पटेलही आमच्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या."

जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, "भारत जोडो न्याय यात्रेचा आज 37 वा दिवस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज बाबूगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आम्ही आज रात्री अमेठीत राहू आणि सकाळी रायबरेलीला जाणार आहोत. त्यानंतर उद्या लखनौमध्ये राहू. आम्ही दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये थांबू. त्यानंतर 22 आणि 23 फेब्रुवारीला विश्रांती घेऊ."

राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही आज अमेठीमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी सांगितलं होतं की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मला बरं वाटल्यावर मी या यात्रेत सहभागी होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व लोकांनी पूर्ण मेहनत घेऊन यात्रेची तयारी सुरू ठेवावी. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस