शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Rahul Gandhi : "देशात भीती आणि द्वेषाचे वातावरण, उद्या काय होईल माहीत नाही"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:41 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधींनी पदयात्रेदरम्यान लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पोहोचली आहे. वाराणसीतील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. माझ्या प्रवासादरम्यान मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे."

पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. लाखो लोक पायी चालत आले हे तुम्ही पाहिलं असेल. या प्रवासादरम्यान दर कोणी पडलं, थकलं तर त्याला उचललं जायचं. शेतकरी आले, मजूर आले, छोटे व्यापारी आले, बेरोजगार तरुण आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं."

"संपूर्ण भारत जोडो यात्रेत कुठेही द्वेष दिसला नाही"

"जेव्हा छोटे व्यापारी मला भेटायचे तेव्हा ते म्हणायचे की, उद्या काय होईल याची आम्हाला भीती वाटते. संपूर्ण यात्रेत मला कुठेही द्वेष दिसला नाही. भाजपाचे लोक यायचे, आरएसएसचे लोक यायचे. यात्रेदरम्यान ते भेटायचे. भेट देताच ते प्रेमाने बोलायचे. हा देश द्वेषाचा देश नसून प्रेमाचा देश आहे. एकत्र काम केले तरच मजबूत होतो" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"एकमेकांना जोडून ठेवणं ही देशभक्ती"

"जेव्हा घरात भाऊ भांडतात तेव्हा घर कमकुवत होतं. तसेच देशात एकमेकांशी भांडलो तर देशही कमजोर होईल. एकमेकांना जोडून ठेवणं ही देखील देशभक्ती आहे. मी इथे अहंकाराने आलो नाही. मी माझ्या प्रवासापूर्वी टीमला सांगितले होतं की. प्रवासात अनेक आव्हाने असतील. लोक मला भेटायला येतील, गरीब लोक येतील, श्रीमंत लोक येतील. प्रत्येकजण येईल, जो येईल त्याला वाटावं की मी माझ्या घरी आलो आहे, माझ्या भावाला भेटायला आलो आहे. मला प्रेमाने भेटा. जेव्हा आम्ही ते करत होतो तेव्हा थकवा नव्हता, कारण त्या प्रवासात देशाची शक्ती आमच्या सोबत होती" असंही राहुल यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा