शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "देशात भीती आणि द्वेषाचे वातावरण, उद्या काय होईल माहीत नाही"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:41 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधींनी पदयात्रेदरम्यान लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पोहोचली आहे. वाराणसीतील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. माझ्या प्रवासादरम्यान मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे."

पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. लाखो लोक पायी चालत आले हे तुम्ही पाहिलं असेल. या प्रवासादरम्यान दर कोणी पडलं, थकलं तर त्याला उचललं जायचं. शेतकरी आले, मजूर आले, छोटे व्यापारी आले, बेरोजगार तरुण आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं."

"संपूर्ण भारत जोडो यात्रेत कुठेही द्वेष दिसला नाही"

"जेव्हा छोटे व्यापारी मला भेटायचे तेव्हा ते म्हणायचे की, उद्या काय होईल याची आम्हाला भीती वाटते. संपूर्ण यात्रेत मला कुठेही द्वेष दिसला नाही. भाजपाचे लोक यायचे, आरएसएसचे लोक यायचे. यात्रेदरम्यान ते भेटायचे. भेट देताच ते प्रेमाने बोलायचे. हा देश द्वेषाचा देश नसून प्रेमाचा देश आहे. एकत्र काम केले तरच मजबूत होतो" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"एकमेकांना जोडून ठेवणं ही देशभक्ती"

"जेव्हा घरात भाऊ भांडतात तेव्हा घर कमकुवत होतं. तसेच देशात एकमेकांशी भांडलो तर देशही कमजोर होईल. एकमेकांना जोडून ठेवणं ही देखील देशभक्ती आहे. मी इथे अहंकाराने आलो नाही. मी माझ्या प्रवासापूर्वी टीमला सांगितले होतं की. प्रवासात अनेक आव्हाने असतील. लोक मला भेटायला येतील, गरीब लोक येतील, श्रीमंत लोक येतील. प्रत्येकजण येईल, जो येईल त्याला वाटावं की मी माझ्या घरी आलो आहे, माझ्या भावाला भेटायला आलो आहे. मला प्रेमाने भेटा. जेव्हा आम्ही ते करत होतो तेव्हा थकवा नव्हता, कारण त्या प्रवासात देशाची शक्ती आमच्या सोबत होती" असंही राहुल यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा