शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

Rahul Gandhi : "देशात भीती आणि द्वेषाचे वातावरण, उद्या काय होईल माहीत नाही"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:41 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधींनी पदयात्रेदरम्यान लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पोहोचली आहे. वाराणसीतील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात द्वेषाचे वातावरण आहे. हा देश द्वेषाचा देश नाही. मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेलो. माझ्या प्रवासादरम्यान मला हजारो लोक भेटले. देशात भीतीचे वातावरण आहे."

पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांना संबोधित केलं. "भारत जोडो यात्रा सुरू करून एक वर्ष झाले आहे. मी कन्याकुमारी ते काश्मीर चाललो. या 4 हजार किलोमीटरच्या प्रवासात मला हजारो लोक भेटले. लाखो लोक पायी चालत आले हे तुम्ही पाहिलं असेल. या प्रवासादरम्यान दर कोणी पडलं, थकलं तर त्याला उचललं जायचं. शेतकरी आले, मजूर आले, छोटे व्यापारी आले, बेरोजगार तरुण आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं."

"संपूर्ण भारत जोडो यात्रेत कुठेही द्वेष दिसला नाही"

"जेव्हा छोटे व्यापारी मला भेटायचे तेव्हा ते म्हणायचे की, उद्या काय होईल याची आम्हाला भीती वाटते. संपूर्ण यात्रेत मला कुठेही द्वेष दिसला नाही. भाजपाचे लोक यायचे, आरएसएसचे लोक यायचे. यात्रेदरम्यान ते भेटायचे. भेट देताच ते प्रेमाने बोलायचे. हा देश द्वेषाचा देश नसून प्रेमाचा देश आहे. एकत्र काम केले तरच मजबूत होतो" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"एकमेकांना जोडून ठेवणं ही देशभक्ती"

"जेव्हा घरात भाऊ भांडतात तेव्हा घर कमकुवत होतं. तसेच देशात एकमेकांशी भांडलो तर देशही कमजोर होईल. एकमेकांना जोडून ठेवणं ही देखील देशभक्ती आहे. मी इथे अहंकाराने आलो नाही. मी माझ्या प्रवासापूर्वी टीमला सांगितले होतं की. प्रवासात अनेक आव्हाने असतील. लोक मला भेटायला येतील, गरीब लोक येतील, श्रीमंत लोक येतील. प्रत्येकजण येईल, जो येईल त्याला वाटावं की मी माझ्या घरी आलो आहे, माझ्या भावाला भेटायला आलो आहे. मला प्रेमाने भेटा. जेव्हा आम्ही ते करत होतो तेव्हा थकवा नव्हता, कारण त्या प्रवासात देशाची शक्ती आमच्या सोबत होती" असंही राहुल यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा