शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 19:12 IST

Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते.

Bharat Gold Mines: केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेड (BGML) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारत गोल्ड माईन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, एप्रिल 1972 मध्ये खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली याला समाविष्ट केले गेले होते. ही खाण कोलार गोल्ड फील्ड (KGF) म्हणूनही ओळखला जातो. या KGFच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या KGF या चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 1900 च्या पहिल्या दशकात येथे सोन्याचे उत्पादन झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी भारतातील 95 टक्के सोन्याचे उत्पादन केजीएफमधून होत असे. 

2006 मध्ये केंद्र सरकारने जागतिक निविदेद्वारे मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळ निघून गेल्याने, विविध बदल आणि समस्यांमुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र, कंपनी बंद झाल्यानंतर तिचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी होत आहे. अनेक राज्ये आणि केंद्रीय मंत्रीही कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्राने 2021 मध्ये स्पष्ट केले आहे.

2001 पासून कामकाज बंद केलेकोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "भारत गोल्ड माइन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एप्रिल, 1972 मध्ये पूर्वीच्या खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली KGF येथे कार्यालयासह समाविष्ट करण्यात आला होता. यात प्रामुख्याने सोन्याचे खाणकाम करण्यासाठी KGF आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी काम व्हायचे. त्याचे ऑपरेशन आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य बनल्यामुळे, 12 जून 2000 रोजी ते बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. 1 मार्च 2001 पासून बीजीएमएलचे कामकाज बंद करण्यात आले. 

टॅग्स :kgf 2केजीएफGoldसोनंCentral Governmentकेंद्र सरकार