शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

"शेतकऱ्यांची तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी चुकीची आहे" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:50 IST

Farmers Protest : बाजारपेठ शेतकर्‍यांसाठी संपणार नाही किंवा एमएसपीही संपणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणी ताब्यात घेणार नाहीत. हे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावर, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

तीन कृषी कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्या आणि एमएसपी कायमच राहतील. तिन्ही कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी चुकीची आहे, असे म्हणत मोदी सरकारमध्ये शेतकरी आनंदी होत आहेत, असा दावा रविशंकर प्रसाद यांनी News18 India सोबत बोलताना केला आहे. तसेच, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकर्‍यांचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी सरकार समर्पित आहे. बाजारपेठ शेतकर्‍यांसाठी संपणार नाही किंवा एमएसपीही संपणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणी ताब्यात घेणार नाहीत. हे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

अनेक दिवसांपासून चर्चा होत असतानाही शेतकरी अद्याप आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, "आमचे वरिष्ठ मंत्री बोलत आहेत आणि चर्चा चालू आहे. यावर मी भाष्य करणार नाही. नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकर्‍यांना आणि त्यांच्या विकासाला समर्पित आहे. आमच्या सरकारने किसान सम्मान निधीच्या माध्यमातून 10 कोटी शेतकऱ्यांना 1 लाख कोटी रुपये दिले आहेत." याचबरोबर, आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठीअनेक योजना आणल्या आहेत. एमएसपीवर सुरू झालेल्या चर्चा कायदा रद्द करण्यापर्यंत कशी पोहोचली? यामागील कोणती शक्ती हा मोठा प्रश्न आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत 60,000 कोटी रुपयांचे धान एमएसपीवर खरेदी करण्यात आले आहे. एमएसपी देखील वाढविण्यात येत आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBharat Bandhभारत बंद