शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:39 IST

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जास्त दारू प्यायल्याने जर्मनीतील एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा दावा करण्यात येतोय.

मोहाली: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा दावा बादल यांनी केला आहे. यांच्या म्हणण्यानुसार, सीएम मान यांनी जास्त दारू प्यायल्याने एअरलाइन्सने हे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.

भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. सुखबीर बादल यांनी ट्विट केले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. हा रिपोर्ट जगभरातील पंजाबींना लाजवेल असा आहे.' ते पुढे म्हणाले की, 'धक्कादायक बाब म्हणजे पंजाब सरकार मुख्यमंत्र्यांबाबतच्या अशा रिपोर्टवर मौन बाळगून आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने पावले उचलली पाहिजेत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल, तर भारत सरकारने यावर जर्मन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.' दुसरीकडे ब्रिकम सिंह मजिठिया यांनीही या प्रकरणी भगवंत मान यांची खरडपट्टी काढली आहे.

भाजप खासदाराचा टोला विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीएम भगवंत मान प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांना फ्रँकफर्टमध्ये उतरवण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे हा मुद्दा मांडण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी ट्विट करून म्हटले की, भगवंत मान यांनी केजरीवाल यांना भारतात आणि परदेशात दारूला हात लावणार नाही असे वचन दिले होते.

'आप'ने आरोप फेटाळलेआपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले, हे आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती, 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटा प्रचार आहे.'

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबGermanyजर्मनी