शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:39 IST

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जास्त दारू प्यायल्याने जर्मनीतील एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा दावा करण्यात येतोय.

मोहाली: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा दावा बादल यांनी केला आहे. यांच्या म्हणण्यानुसार, सीएम मान यांनी जास्त दारू प्यायल्याने एअरलाइन्सने हे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.

भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. सुखबीर बादल यांनी ट्विट केले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. हा रिपोर्ट जगभरातील पंजाबींना लाजवेल असा आहे.' ते पुढे म्हणाले की, 'धक्कादायक बाब म्हणजे पंजाब सरकार मुख्यमंत्र्यांबाबतच्या अशा रिपोर्टवर मौन बाळगून आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने पावले उचलली पाहिजेत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल, तर भारत सरकारने यावर जर्मन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.' दुसरीकडे ब्रिकम सिंह मजिठिया यांनीही या प्रकरणी भगवंत मान यांची खरडपट्टी काढली आहे.

भाजप खासदाराचा टोला विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीएम भगवंत मान प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांना फ्रँकफर्टमध्ये उतरवण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे हा मुद्दा मांडण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी ट्विट करून म्हटले की, भगवंत मान यांनी केजरीवाल यांना भारतात आणि परदेशात दारूला हात लावणार नाही असे वचन दिले होते.

'आप'ने आरोप फेटाळलेआपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले, हे आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती, 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटा प्रचार आहे.'

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबGermanyजर्मनी