शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Bhagwant Maan: दारू प्यायल्याने CM भगवंत मान यांना विमानातून उतरवले? केंद्रीय मंत्र्याने दिली चौकशीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:39 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीत जास्त दारू प्यायल्याने विमानातून खाली उतरवल्याचा दावा केला जातोय.

नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhagwant Maan) यांना जर्मनीत विमानातून खाली उतरवल्याच्या आरोपावरून खळबळ उडाली आहे. भाजप, अकाली दल आणि काँग्रेससह सर्व पक्ष या प्रकरणी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून स्पष्टीकरण मागत आहेत. यातच आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (jyotiraditya scindia) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

भगवंत मान प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीशी संबंधित प्रश्नावर ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, "ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे, त्यामुळे आम्हाला प्रथम तथ्य तपासावे लागेल. मला पाठवलेल्या अपीलांच्या आधारे मी निश्चितपणे यात लक्ष घालेन.'' दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. ते 17 सप्टेंबरला भारतात परतणार होते.  यावेळी लुफ्थांसा एअरलाइन्सने त्यांना जास्त दारू प्यायल्यामुळे विमानातून खाली उतरवले. प्रवाशांच्या हवाल्याने ही माहिती सांगितली जात आहे.

भगवंत मान विरोधकांच्या निशाण्यावर यावरून शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. ही गोष्ट जगभरातील पंजाबींना लाजवणारी आहे.'

काँग्रेसने चौकशीची मागणी केलीविरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर हा मुद्दा मांडणार असून चौकशीची मागणी करणार असल्याचे बाजवा यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपनेही याप्रकरणी आप सरकारवर निशाणा साधला आहे.

'आप'ने हे वृत्त निराधार असल्याचे सांगितलेआपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले आहेत. हे आरोप निराधार आहेत. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती आणि 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAAPआपPunjabपंजाब